शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य : बंद पडलेल्या शाळेची आरटीईत नोंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:29 IST

शासनातर्फे गरीब मुलांना नामांकित शाळेत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई सुरू करण्यात आले. यात शाळांनी नोंदणी केल्यानंतर २५ टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवायच्या आहेत. त्याचा मोबदला शासन शाळांना देणार आहे. पण यात आता बंद पडलेल्या शाळांचीही नोंदणी झाली आहे आणि या शाळेत लॉटरीच्या सोडतीत बालकांची निवड झाली आहे. पालक जेव्हा बालकांना घेऊन शाळेत प्रवेशाला गेले. तेव्हा बंद पडलेल्या शाळेच्या शटरला बकऱ्या बांधलेल्या होत्या. पालकांनी यासाठी शिक्षण विभागावर संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देलॉटरीच्या सोडतीत विद्यार्थ्यांची निवड : शिक्षण विभागावर ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनातर्फे गरीब मुलांना नामांकित शाळेत शिक्षण मिळावे यासाठी आरटीई सुरू करण्यात आले. यात शाळांनी नोंदणी केल्यानंतर २५ टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवायच्या आहेत. त्याचा मोबदला शासन शाळांना देणार आहे. पण यात आता बंद पडलेल्या शाळांचीही नोंदणी झाली आहे आणि या शाळेत लॉटरीच्या सोडतीत बालकांची निवड झाली आहे. पालक जेव्हा बालकांना घेऊन शाळेत प्रवेशाला गेले. तेव्हा बंद पडलेल्या शाळेच्या शटरला बकऱ्या बांधलेल्या होत्या. पालकांनी यासाठी शिक्षण विभागावर संताप व्यक्त केला आहे.आरटीईची अंतर्गत शाळांची नोंदणी करताना शाळेची चौकशी करण्यात येते. यु-डायस, सरलअंतर्गत दिलेली माहिती आदी तपासली जाते. त्यानंतर शाळेची आरटीईमध्ये नोंद केली जाते. हंसापुरी, नालसाहब चौक येथील एस.आय. कॉन्व्हेंट ही शाळा दोन वर्षापासून बंद आहे. पण २०१९-२० या शैक्षणिक वर्षात आरटीईमध्ये १९ एनजीओ ३८८९ या क्रमांकाने नोंदणीकृत आहे. या बंद पडलेल्या शाळेत आदीबा खान या बालिकेची लॉटरीच्या सोडतीत निवड झाली. पालक शाळेमध्ये विचारणा करण्यास गेल्यावर शाळेचे शटर बंद होते आणि त्याला बकºया बांधलेल्या होत्या. पालकांनी लगेच आरटीई व्हेरीफिकेशन कमिटीकडे याची तक्रार केली. कमिटीच्या सदस्यांनी शाळेला भेट देऊन परिसरात विचारणा केली असता, ही शाळा गेल्या दोन वर्षापासून बंद असल्याचे लोकांनी समितीच्या सदस्यांना सांगितले.अ‍ॅक्टीव्हीटी फी च्या नावाने पैशाची मागणीनंदनवनमधील स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलमध्ये आरटीईमध्ये प्रवेशाच्या पूर्वीच पालकांना अ‍ॅक्टीव्हीटी फीच्या नावावर पालकांना २००० रुपयांची मागणी केली आहे. यासंदर्भातही तक्रार आरटीई व्हेरीफिकेशन समितीच्या सदस्यांकडे आली आहे. आरटीईच्या नियमानुसार आरटीई अंतर्गत प्रवेशित बालकांकडून कुठलेही शुल्क वापरता येत नाही.बंद पडलेल्या शाळेची आरटीईत नोंद होणे, ही बाब शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेणारी आहे. तसेच पालकांकडून विविध उपक्रमांतर्गत पैसे वसूल करणेही नियमबाह्य असून, प्रशासनाने शाळेवर कारवाई करणे गरजेचे आहे.मो. शाहीद शरीफ, सदस्य, आरटीई व्हेरीफिकेशन कमिटी

 

टॅग्स :SchoolशाळाRight To Educationशिक्षण हक्क कायदा