शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

गोवारीवरील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:12 IST

गोवारी हे आदिवासी असून त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे लाभ नाकारले जाऊ शकत नाही असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या १४ आॅगस्ट रोजी दिला. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी या प्रकरणात उच्च न्यायालयामध्ये सरकारची बाजू मांडणारे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. एम. जे. खान यांचे मत मागविण्यात आले आहे.

ठळक मुद्देआदिवासी विभागाची तयारी सुरू : सहायक सरकारी वकिलाला मागितले मत

राकेश घानोडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोवारी हे आदिवासी असून त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे लाभ नाकारले जाऊ शकत नाही असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या १४ आॅगस्ट रोजी दिला. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी या प्रकरणात उच्च न्यायालयामध्ये सरकारची बाजू मांडणारे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. एम. जे. खान यांचे मत मागविण्यात आले आहे.अनुसूचित जमाती प्रवर्गाचे लाभ मिळावे याकरिता गोवारी समाज २३ वर्षांपासून संघर्ष करीत होता. परंतु, सरकारने त्यांचे ऐकले नाही. उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला असला तरी, सरकार त्यावर निमूटपणे अंमलबजावणी करणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकते का, याची चाचपणी सरकार करीत आहे.सध्या गोवारी समाजाला राज्य सरकार विशेष मागास प्रवर्गाचे लाभ देत आहे. राज्यासाठी लागू अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये गोंड-गोवारी जमातीचा समावेश आहे. परंतु, राज्यात गोंड-गोवारी नावाची जमातच अस्तित्वात नाही असे गोवारी समाज आतापर्यंत ओरडून सांगत होता. उच्च न्यायालयाने त्यांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले आहे. गोंड-गोवारी जमात १९११ पूर्वीच लुप्त झाल्याचे व राज्यामध्ये गोंड-गोवारी संबोधले जात असलेले सर्वजन गोवारी असल्याचे उच्च न्यायालयाच्या निर्णयात म्हटले गेले आहे. राज्य सरकारने या मुद्यावर संशोधन करण्यासाठी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सची नियुक्ती केली होती. त्या संस्थेलाही कोठेच गोंड-गोवारी जमात आढळून आली नाही. असे असताना गोवारी समाजाला सरकारस्तरावर न्याय मिळाला नाही. न्यायालयातून दिलासा मिळाला, पण सध्या तो अधांतरी आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेल्यास गोवारी समाजाला स्वत:च्या हक्कासाठी पुन्हा लढावे लागेल.आदिवासी विभागाने पत्र पाठविलेआदिवासी विकास विभागाने पत्र पाठवून उच्च न्यायालयाच्या निर्णयावर मत मागवले आहे. सध्या निर्णयाचा अभ्यास करीत आहे. निर्णयाची सर्व बाजूने पडताळणी पूर्ण केल्यानंतर विभागाला मत कळवेन. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायची की, नाही याचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार विधी व न्याय विभागाला आहेत.अ‍ॅड. एम.जे. खान.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSC STअनुसूचित जाती जमाती