शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

एव्हरेस्टवरून सूर्योदयाचे दृश्य विसरणार नाही : प्रणवने मांडला ३५ दिवसांचा भावनिक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:41 PM

एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.

ठळक मुद्देएव्हरेस्टवीराचा हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.सीएसी ऑलराऊंडर अ‍ॅडव्हेंचरतर्फे नागपूरचे भूषण ठरलेल्या प्रणव बांडबुचे याचा हृद्य सत्कार शुक्रवारी विष्णूजी की रसोई, बजाजनगर येथे करण्यात आला. यावेळी प्रणवने एव्हरेस्टच्या सर्वोच्च स्थानावर पोहचण्याचा प्रवास मांडला. याप्रसंगी मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे, निखिल मुंडले, तेजिंदर सिंह रेणू व शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते. प्रणवने सांगितले, १५ एप्रिलला काठमांडूवरून हेलिकाप्टरने एव्हरेस्टच्या पायथ्याशी नामचे येथे पोहचलो. त्यानंतर १९ एप्रिलपासून रोटेशननुसार आमच्या टीमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर बेस कॅम्पपासून १६ मे रोजी प्रत्यक्ष समिट पुशला सुरुवात झाली. पुढे पहिला डेथ झोन समजला जाणारा खुंब आईसफॉल पार केला.प्रणवने पुढे सांगितले, यावर्षीचे वातावरण अतिशय धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळेच यावर्षी ११ गिर्यारोहकांचे एव्हरेस्ट सर करताना मृत्यू झाले तर १४ लोकांना दृष्टिदोषाची समस्या निर्माण झाली. आधीच्या अंदाजानुसार आम्हाला २३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे समिट पुशपासून आम्ही आमचे नियोजन केले होते. सुदैवाने नियोजनानुसार बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. त्यानुसार कॅम्प २, कॅम्प ३ आणि सर्वात धोकादायक कॅम्प ४ नंतरचा प्रवास करून आम्ही १९ मे रोजी साऊथ पोलला पोहचलो. तिथे अधिक वेळ न थांबता आमचा प्रवास सुरू केला आणि २० मेच्या पहाटे ७.३० वाजता आम्ही जगातील सर्वात उंच शिखरावर होतो. सर्वोच्च शिखरावर पोहचण्याचा आनंद शब्दात सांगू शकत नसल्याची भावना त्याने व्यक्त केली. शिखरावर गेले की खाली यावेच लागते. १० मिनिटे तेथे घालविल्यानंतर पुढचा धोका लक्षात घेऊन आम्हाला परतावे लागले व तो प्रसंग निराशादायी वाटल्याची भावना त्याने मांडली.प्रणव आता अनेक तरुणांचा प्रेरणास्रोत ठरला आहे. तो सांगतो, एकदा नापास झाले की पुन्हा परीक्षा देऊन पास व्हावेच लागते. माझेही तसेच झाले. २०१६ ला अपयशी झाल्यानंतर मला पास व्हायचे होते आणि हीच माझी प्रेरणा ठरल्याचे तो म्हणाला. खाली आलो तेव्हा नागपूरची अनेक मुले तयार होती. त्यांना पाहून थकवा दूर झाला व पुन्हा त्यांच्यासोबत बेस कॅम्पपर्यंत गेल्याचे त्याने सांगितले. त्याने गिर्यारोहणाच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगत तरुणांना या क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.यावेळी एव्हरेस्ट प्रवासात प्रणवने वापरलेले साहित्यही आणि प्रवासातील छायाचित्रांचे पडद्यावर प्रदर्शन येथे करण्यात आले. सीएसीचे अमोल खंते व विजय जत्थे यांनी संचालन केले.

टॅग्स :Everestएव्हरेस्ट