शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

२९ सप्टेंबरची यशस्वी प्रवेश चाचणी रद्द, एनटीएचा गाेंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 09:29 IST

२२ ला परीक्षेची जाहिरात, तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमाेड

निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे ओबीसी, ईबीसी व डीएनटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी २९ सप्टेंबरला हाेणारी ‘यशस्वी प्रवेश चाचणी’ अचानक रद्द करण्याची घाेषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) बुधवारी पत्रकाद्वारे केली. विशेष म्हणजे २२ सप्टेंबरला परीक्षेची जाहिरात  देण्यात आली आणि चार दिवसांत २६ सप्टेंबरला परीक्षा रद्द करण्याचे पत्रक काढण्यात आले. 

केंद्रीय सामाजिक न्याय विभागातर्फे इतर मागासवर्ग (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) व डीएनटीच्या इयत्ता ९ व १० आणि इयत्ता ११ व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘यंग अचीव्हर्स अवाॅर्ड स्काॅलरशिप’ गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी इयत्ता आठवी आणि इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांना ‘यशस्वी एन्ट्रंस टेस्ट’ गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली. एनटीएद्वारे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ९वी व १० वीत प्रतिवर्षी ७५ हजार आणि ११ व १२ वीच्या पात्र विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. 

विद्यार्थ्यांवर दडपण नकाे म्हणून...एनटीएच्या पत्रकानुसार यशस्वी प्रवेश परीक्षेऐवजी विद्यार्थ्यांच्या आठवी व १०वीच्या गुणांच्या आधारावरच ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ६० टक्क्यांच्या वर गुण असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज द्यायचा आहे. त्यानंतर नॅशनल स्काॅलरशिप पाेर्टलवरून विद्यार्थ्यांची निवड हाेईल, असे पत्रकात नमूद आहे. विद्यार्थ्यांवर आणखी एका परीक्षेचे दडपण नकाे म्हणून ही परीक्षा रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

याआधीही दाेन याेजनेच्या परीक्षा बंदकेंद्र सरकारने यापूर्वी नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएस) परीक्षा व किशाेर वैज्ञानिक प्राेत्साहन याेजना सुरू केली हाेती. मात्र, दाेन वर्षांपूर्वी या दाेन्ही याेजना बंद झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता ही तिसरी याेजना बंद करण्याचे प्रयत्न असल्याचे बाेलले जात आहे.

आमच्या शाळेत १८ विद्यार्थी या परीक्षेला बसले हाेते व त्यांनी कसून तयारी केली हाेती. मात्र अचानक ही परीक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांवर दडपण येत असल्याचे कारण दिले जाते, तर मग परीक्षाच कशाला जाहीर केली?  - सय्यद मकसूद पटेल, मुख्याध्यापक, उर्दू हायस्कूल, यवतमाळ

टॅग्स :nagpurनागपूरexamपरीक्षाStudentविद्यार्थी