शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

नागपुरात हजारो विद्यार्थी करताहेत बाबासाहेबांच्या विचारांचे अध्ययन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:36 IST

महामानवाच्या विचारांना, व्यक्तिमत्त्वाला समजण्याची, अभ्यासण्याची इच्छा आज अनेकांच्या मनात येते. ही संधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागा’ने उपलब्ध केली आहे.

ठळक मुद्दे‘डॉ. आंबेडकर थॉट’ विभागाचे योगदान : दरवर्षी हाउसफुल होतात जागा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण ही संज्ञा म्हणून गृहित धरली तर या संज्ञेला पर्याय ठरणारे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. धर्मशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र किंवा मानववंशशास्त्र आणि विज्ञान असा कोणताच विषय नाही जो बाबासाहेबांच्या कक्षेतून सुटला असेल. अमर्याद अध्ययनातून त्यांच्या विचारात आलेली परिपक्वता आणि मौलिकता कालसुसंगत ठरली आहे. देशातील कोणत्याही परिस्थितीत त्यांनी मांडलेले विचार प्रमाण मानावे व त्यानुसार वाटचाल करावी, एवढी परिणामकारकता त्यात आहे. म्हणूनच वर्णव्यवस्थेने शिक्षणच नाकारलेला हा महामानव आज मात्र अभ्यासाचा आणि स्वतंत्र अभ्यासक्रमाचा विषय ठरला आहे. या महामानवाच्या विचारांना, व्यक्तिमत्त्वाला समजण्याची, अभ्यासण्याची इच्छा आज अनेकांच्या मनात येते. ही संधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागा’ने उपलब्ध केली आहे.आंबेडकरी व दलित साहित्याच्या उदयामुळे बाबासाहेबांच्या विचारांना अभ्यासण्याकडे लोकांचा कल वाढत गेला व त्यामुळे त्यांच्या स्वतंत्र अभ्यासक्रमाची गरज निर्माण झाली. याच विचारातून रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते वा.को. गाणार यांनी नागपूर विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे १९८८ साली विद्यापीठातर्फे डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग सुरू करण्यात आला. त्यावेळी डॉ. उंदीरवाडे यांना विभागाचे पहिले मानद विभागप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. एखाद्या व्यक्तीच्या अभ्यासाकरिता सुरू झालेला हा देशातील पहिला विभाग होता, हे विशेषत्वाने नमूद करावे लागेल. पुढे पुणे, मुंबई आदी ठिकाणच्या विद्यापीठातही हा अभ्यासक्रम सुरू झाला. त्यावेळी विभागासाठी ४० विद्यार्थ्यांची संख्या निर्धारित करण्यात आली होती, जी आजही कायम आहे. आश्चर्य म्हणजे पहिल्या वर्षीपासून अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. उलट प्रवेश न मिळाल्यामुळे अनेकांना निराश व्हावे लागते. विद्यापीठाच्या अनेक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांची वानवा असताना हा विभाग मात्र दरवर्षी हाऊसफुल व्हावा, ही विशेष बाबच म्हणावी लागेल.विद्यमान विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी सांगितले, विभागाचे वाचनालय अद्ययावत आणि सुसज्जित असून डॉ. आंबेडकर यांचा विचार मांडणाºया १० हजार पुस्तकांनी समृद्ध आहे. वसंत मून यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व पुस्तके या विभागाला दान दिल्याने हे वाचनालय अधिकच समृद्ध झाले आहे. हजारो विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास केला व अनेकांनी संशोधन पूर्ण केले आहे.नोकरीपेशा, व्यावसायिकही विभागाचे विद्यार्थीशिक्षणासाठी वयाचे बंधन नसते. बाबासाहेबांनीही स्वत:ला आजीवन विद्यार्थीच मानले. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी येणारे विद्यार्र्थी या विचारांशी सुसंगत आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांसह डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकिंग क्षेत्रातील नोकरीपेशा, व्यावसायिक, राजकारणी, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील लोक या विभागाचे विद्यार्थी आहेत. अनेकजण निवृत्तीनंतरही येथे प्रवेश घेतात. ज्यांना बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान माहिती करायचे आहे, सविस्तर अभ्यास करायचा आहे, असे कुणीही या विभागाचे विद्यार्थी असून यामध्ये सर्वधर्मीय, सर्वजातीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.डॉ. बाबासाहेबांचे सिद्धांत, तत्त्वज्ञानाचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने विभागात केला जातो. त्यांच्या विचारांचे अध्ययन हे वर्तमान काळात महत्त्वपूर्ण झाले आहे. त्यामुळे दरवर्षी बाबासाहेबांना अभ्यासण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतच जात आहे. ही विद्यापीठ व आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.- डॉ. प्रदीप आगलावे, विभागप्रमुख, डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ