शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दहावीचा शेवटचा पेपर देऊन परतणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 8:20 PM

गावात दहावीपर्यंतचे वर्ग नाही. त्यामुळे गावाबाहेर शिकण्यासाठी दररोज साडेतीन किमीचे अंतर सायकलने ये-जा करायची. पूर्ण वर्ष संपले, बोर्डाची परीक्षा सुरू झाली. शेवटचा पेपरही झाला. मात्र हा पेपर झाल्यानंतर उन्हाळी सुट्यांमध्ये मौजमस्ती करण्याची ‘तिची’ इच्छा अपुरीच राहिली. पेपर आटोपून घरी जात असताना भरधाव ट्रकने तिच्या सायकलला जबर धडक दिली. त्यात ती विद्यार्थिनी जागीच गतप्राण झाली. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडोरामा गेट क्र. ६ समोर घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील टाकळघाटच्या इंडोरामा गेटसमोर भीषण अपघात, नागरिकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावात दहावीपर्यंतचे वर्ग नाही. त्यामुळे गावाबाहेर शिकण्यासाठी दररोज साडेतीन किमीचे अंतर सायकलने ये-जा करायची. पूर्ण वर्ष संपले, बोर्डाची परीक्षा सुरू झाली. शेवटचा पेपरही झाला. मात्र हा पेपर झाल्यानंतर उन्हाळी सुट्यांमध्ये मौजमस्ती करण्याची ‘तिची’ इच्छा अपुरीच राहिली. पेपर आटोपून घरी जात असताना भरधाव ट्रकने तिच्या सायकलला जबर धडक दिली. त्यात ती विद्यार्थिनी जागीच गतप्राण झाली. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडोरामा गेट क्र. ६ समोर घडली.वैष्णवी राजेंद्र ढवळे (१६, रा. टेंभरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने साडेतीन किमी अंतरावरील टाकळघाट गाठले. गाव ते शाळा हे साडेतीन किमीचा प्रवास वैष्णवी ही सायकलने ये-जा करायची. पावसाळा, हिवाळ्यातील अवरोध लक्षात घेतले तरी ती शाळेपासून दूर झाली नाही. यावर्षी वैष्णवी ही दहावीला होती. टाकळघाट येथील श्रीमती निस्ताने विद्यालयात ती शिकत होती. बोर्डाची परीक्षा असल्याने तिने चांगली तयारी केली. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन भविष्यात वाटचाल करावी, असे तिचे स्वप्न होते. टाकळघाट येथीलच अमर हायस्कूल हे तिचे परीक्षा केंद्र होते. परीक्षाही संपत आली असताना उन्हाळी सुट्यांचा प्लान ‘तिने’ केला होता. गुरुवारी दहावीचा ‘माहिती तंत्रज्ञान संप्रेषण’ हा शेवटचा पेपर होता. सकाळी ११ वाजता असल्याने ती सकाळीच सायकलने घरून निघाली. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचली, पेपर सोडविला. त्यानंतर मैत्रिणींशी बोलून ती तिच्या टेंभरी गावाकडे सायकलने निघाली. दरम्यान इंडोरामा कंपनीजवळचे वळण पार करून जाताच इंडोरामाकडून येणाºया एमएच-३४/एबी-५७४९ क्रमांकाच्या ट्रकने तिच्या सायकलला जबर धडक दिली. त्यात गंभीररीत्या जखमी होऊन तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकचालक फरार झाला.अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत बुटीबोरी एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकास काही अंतरावर नागरिकांच्या सतर्कतेने ताब्यात घेण्यात आले. उमेश जंगली महतो (६०, रा. चंद्रपूर) असे अटकेतील ट्रक चालकाचे नाव आहे. पुढील तपास ठाणेदार मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.गतिरोधकाची मागणीविद्यार्थिनीला ट्रकने धडक दिली, त्या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले. त्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले तर कितीतरी नागरिकांना कायमचे अंपगत्व आले. याशिवाय किरकोळ अपघात हे सुरूच असतात. त्यामुळे त्या परिसरात गतिरोधक लावण्याची मागणी नागरिकांनी कित्येकदा केली. मात्र त्याकडे लक्षच देण्यात आले नाही. त्यातच गुरुवारी विद्यार्थिनीचा अपघात होऊन मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा गतिरोधकाची मागणी पुढे आली. गतिरोधक लावण्यात आला नाही तर आंदोलन करू, असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू