शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विद्यार्थ्यांचे वसतिगृह अद्यापही फायलीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:08 AM

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्याापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह बांधण्यासंदर्भात दोन वर्षांअगोदर ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्याापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह बांधण्यासंदर्भात दोन वर्षांअगोदर घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूददेखील करण्यात आली. परंतु तीन वर्ष उलटून गेल्यावरदेखील अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. नवीन वसतिगृह अद्यापही फायलीतच अडकून पडले आहे. विद्यार्थीहिताच्या विधायक कार्यात लेटलतिफीची विद्यापीठाची परंपरा कधी संपेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या ‘कोरोना’मुळे विद्यापीठातील प्रत्यक्ष वर्ग सुरू झालेले नाहीत. मात्र एरवी नागपूर विद्यापीठात मोठ्या प्रमाणात बाहेरगावचे विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु वसतिगृहातील खोल्यांची संख्या अपुरी आहे. विशेषत: विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृह तसेच कॅम्पसजवळील वसतिगृहात अनेकांना प्रवेश मिळू शकत नाही. विधी महाविद्यालयाजवळील वसतिगृहाची अवस्था फारशी चांगली नाही. या सर्व बाबी लक्षात घेता विद्यापीठाने नवीन वसतिगृह बांधण्याचे ठरविले होते. यासंदर्भात फेब्रुवारी २०१८ मध्ये अर्थसंकल्पात १० कोटीची तरतूददेखील करण्यात आली. ‘कॅम्पस’जवळ पदव्युत्तर वसतिगृहाजवळील जागा ठरविण्यात आली व वसतिगृहाचा प्राथमिक आराखडा तयारदेखील करण्यात आला. त्यात सांस्कृतिक सभागृह, वाचनकक्ष, संगणक कक्ष, व्यायाम शाळा इत्यादींचा समावेश होता. हा आराखडा मान्यतेसाठी २०१८ साली ऑगस्ट महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला. मात्र त्यानंतर हा प्रस्ताव फायलीमध्येच बंद आहे. या वसतिगृहाचा खर्च ३५ कोटीहून अधिक राहणार असल्याने विद्यापीठाने शासनाला आर्थिक साहाय्यासाठी पत्र लिहिले होते. मात्र त्याचा पाठपुरावा घेण्यात आला नाही, अशी माहिती विद्यापीठाच्याच एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.

विद्यार्थ्यांना दरवर्षी भुर्दंड

नागपूर विद्याापीठाच्या पदव्युत्तर विभागामध्ये बाहेरील शहर व गावातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, या विद्याार्थ्यांसाठी आवश्यक संख्येत वसतिगृह नसल्याने त्यांना नाईलाजाने जास्त रक्कम खर्च करून भाड्याच्या खोलीत किंवा वसतिगृहामध्ये राहावे लागते. जर आता शासनाने प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात केली तर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

विद्यार्थी संघटनांकडूनदेखील दुर्लक्ष

विद्यार्थीहिताशी निगडित असलेला हा मुद्दा आहे. परंतु एरवी लहानसहान मुद्यावर विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांकडून यासंदर्भात फारसा आवाज उठविण्यात आलेला नाही. केवळ निवेदनात एखादी मागणी म्हणून याला स्थान असते. परंतु प्रभावीपणे हा मुद्दा उचलण्यात आलेला नाही