शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जबरानजोत शेतकरी आणि वनविभागात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:00 IST

वनहक्क कायद्यानुसार, २००५ पूर्वी वनजमिनीच्या जागेवर अतिक्रमण करून तिथे पिढ्यान्पिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरानजोतधारक म्हटले जाते. दावा सिद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून जमीन अधिकृत करून दिली जाते.

ठळक मुद्देबळाचा वापर पिकावर फिरतो नांगरअतिक्रमणधारकांमध्ये संताप

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनविभागाच्या जमिनीवर शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी वनविभागाकडून अलीकडे मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे अतिक्रमण होत असून वनविभागही बळाचा आणि जेसीबीसारख्या यंत्रांचा वापर करून अतिक्रमण साफ करीत आहे. मात्र यात पिकांवर नांगर फिरत असल्याने अतिक्रमणधारक संतप्त आहेत. यामुळे भविष्यात वनविभाग आणि अतिक्रमणधारकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वनहक्क कायद्यानुसार, २००५ पूर्वी वनजमिनीच्या जागेवर अतिक्रमण करून तिथे पिढ्यान्पिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जबरानजोतधारक म्हटले जाते. दावा सिद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून जमीन अधिकृत करून दिली जाते. त्याचा पट्टा शेतकऱ्यांच्या नावावर होतो. चंद्रपूर जिल्ह्यात अशा ४०० हेक्टर जमिनीचे वाटप शासनाकडून करण्यात आले आहे. अनेकांचे दावे कागदपत्रांच्या पुराव्याअभावी अजूनही जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात अतिक्रमण करणारे शेतकरी आणि वनविभागातील संघर्ष अलीकडे वाढला आहे. गावकऱ्यांनी सामूहिक अतिक्रमण केले. ताडोबा व्याघ्रप्रकल्पालगतची जमीन भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. चिमूर तालुक्यात मदनापूर येथील रूपचंद मडावी या शेतकऱ्याने आपली शेती वनविभागाने उद्ध्वस्त केल्याची तक्रार पोलिसात केली आहे. मागील तीस वर्षांपासून आपण शेती कसतो, वनविभागाला महसूल देतो, असे त्याचे म्हणणे आहे. त्याचा वनहक्क दावा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. आगरझरी गावात वनविभागाचे पथक आले होते. मात्र गावकºयांनी आपली प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचे सांगून विरोध केला. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रात १२ हेक्टर जागेवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते.वनविभागाच्या मते या शेतकºयांकडे दस्तऐवज नव्हते. तर, शेतकऱ्यांच्या मते त्यांची शेतीची वहिवाट जुनी आहे. तरीही जेसीबी लावून पेरणी केलेली शेतजमीन १२ जूनला उद्ध्वस्त करण्यात आली. ही जमीन वनविभागाने ताब्यात घेतली. असाच प्रकार ८ जूनला यवतमाळ वनपरिक्षेत्रात वाघापूर वर्तुळातील पिपरी नियतक्षेत्रात घडला. येथील दोन शेतकऱ्यांच्या २.४४ एकर जमिनीचा ताबा वनविभागाने जेसीबी लावून घेतला.

जबरानजोतधारकांची संख्या विदर्भात अधिकविदर्भात अशा जबरानजोतधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विशेषत: चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ही संख्या अधिक आहे. यवतमाळ जिल्ह्यातही या स्वरूपाच्या तक्रारी आता वाढत आहेत. मात्र अनेकांकडून २००५ पूर्वीपासून वनजमिनीवरील शेतीची वहिवाट सुरू असली तरी कागदोपत्री पुरावे मात्र नाहीत. वनविभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून वनहक्कांचे दावे निकाली काढण्याची तरतूद केली आहे. असे असले तरी अनेक दावे अद्यापही जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी