शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भापकरांचा अधिकाऱ्यांवर भडका

By admin | Updated: January 23, 2016 02:58 IST

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नागपुरात शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

नागपूरपेक्षा गडचिरोलीचे काम उत्तम : एकही मुलगा शाळाबाह्य रहायला नकोनागपूर : शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नागपुरात शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. १५ जानेवारीपासून राज्यात शाळाबाह्य मुलांचा सर्वे सुरू झाला आहे. परंतु सर्वेक्षणाची आकडेवारी १०-२० च्यावर वाढत नसल्याचे बघितल्यावर भापकरांचा अधिकाऱ्यांवर चांगलाच भडका उडाला. शिक्षण उपसंचालकासह, शिक्षण अधिकाऱ्यांना झोपा काय काढता, काम करा काम, असा दम त्यांनी दिला. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्यासह शिक्षण अधिकारीही बैठकीत उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून भापकर हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी गडचिरोलीतील शाळांची स्थिती, शिक्षणाची अवस्था, वसतिगृहांना, आश्रम शाळांना भेटी दिल्या. गडचिरोलीचा दौरा आटोपून त्यांनी शुक्रवारी नागपुरात शाळाबाह्य मुलांच्या संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची आढावा बैठक घेतली. बैठकीत शिक्षण अधिकाऱ्यांना किती मुलांचा शोध घेतला, हंगामी वसतिगृहाची अवस्था काय, एज्युकेशन गॅरंटी कार्ड कुणाला दिले यासंदर्भात विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने, ते चांगलेच संतापले. नागपुरात शिक्षण उपसंचालक असतांनाही नागपूरचे काम अतिशय सुस्त असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नागपूरपेक्षा गडचिरोली तरी उत्तम असल्याचा टोला त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला. दररोज झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी माझ्याकडे पाठविण्याचा आदेश त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिला. यावेळी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाने राबविलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण राबविले आहे. राज्यात शाळेत जाणारा एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, यासाठी वर्षभरात ३ बेसलाईन चाचणी घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी सांगितले. सरलच्या माध्यमातून २.२५ कोटी शालेय विद्यार्थ्यांची नोंद संगणकात झाली आहे. याचा फायदा प्रगत शैक्षणिक धोरण राबविण्यात होणार असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आॅनलाईन तपासण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षणाचाही आढावा सरलच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. १५ जानेवारीपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू झाले असून, यासाठी ७० एनएसएसचे समन्वयक व साडेतीन लाख विद्यार्थी महाराष्ट्रात सर्वे करणार आहे. जिल्हास्तरावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात समिती गठित करून सर्वेक्षण करायचे आहे. मुलांचे स्थलांतरण रोखणे, शिक्षण हमी कार्ड देणे यासाठी ४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)