शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

दक्षिण, जीटी, जबलपूर एक्सप्रेसला नरखेड येथे थांबा द्या; विद्यार्थ्यांचा प्रवास ६० ते ७० किमी ने लांबला

By कमलेश वानखेडे | Updated: August 2, 2024 15:10 IST

खा. श्यामकुमार बर्वे यांची लोकसभेत मागणी : कोरोना काळात बंद केलेल्या गाड्या सुरू करा

कमलेश वानखेडे

नागपूर : कोरोना काळात दक्षिण एक्सप्रेस, जीटी एक्सप्रेस, जबलपूर एक्सप्रेस, दानापूर एक्सप्रेस या चार रेल्वे गाड्यांचा नरखेड येथील थांबा बंद करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ६० ते ७० किमीचा प्रवास करून शाळा-कोलेजमध्ये जावे लागते. त्यामुळे या गाड्या लवकरात लवकर पुन्हा सुरू कराव्या, अशी विनंती खा. श्यामकुमार बर्वे यांनी लोकसभेत केली.

खा. बर्वे यांनी सांगितले की, नागपूर-रामटेक लोकसभा मतदारसंघातील अनेक रेल्वे गाड्या कोरोना काळात बंद करण्यात आल्या होत्या. दोन-अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतरही या गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सध्या ४१ रेल्वे प्रकल्प स्वीकृत असून त्यासाठी ८१ हजार ८५० कोटींची गरज आहे. परंतु, बजेटमध्ये फक्त १५ हजार ५०० कोटी मंजूर झाले आहेत. त्यांनी तफावत अध्यक्ष महोदयांच्या लक्षात आणून दिली व यावर सरकारला जाब विचारला. २०१४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने रेल्वेच्या १७ प्रमुख क्षेत्रांना शंभर टक्के एफडीआयसाठी खुलं केले. रेल्वे आधुनिकीकरणाच्या नावावर खासगी कंपन्यांना मूल्यवान भूमी ४५ वर्षांच्या लीजवर दिल्या गेल्या या खासगीकरणाचा खा. बर्वे यांनी जाहीर विरोध दर्शविला.

विद्यार्थी सवलत सुरू करा

रेल्वेमध्ये वृद्धांसाठी कमी झालेला कोटा पुन्हा सुरू करावा आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा काळातील प्रवासादरम्यान मिळणारी सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही खा. बर्वे यांनी लोकसबा अध्यक्षांकडे केली.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर