शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

दक्षिण, जीटी, जबलपूर एक्सप्रेसला नरखेड येथे थांबा द्या; विद्यार्थ्यांचा प्रवास ६० ते ७० किमी ने लांबला

By कमलेश वानखेडे | Updated: August 2, 2024 15:10 IST

खा. श्यामकुमार बर्वे यांची लोकसभेत मागणी : कोरोना काळात बंद केलेल्या गाड्या सुरू करा

कमलेश वानखेडे

नागपूर : कोरोना काळात दक्षिण एक्सप्रेस, जीटी एक्सप्रेस, जबलपूर एक्सप्रेस, दानापूर एक्सप्रेस या चार रेल्वे गाड्यांचा नरखेड येथील थांबा बंद करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ६० ते ७० किमीचा प्रवास करून शाळा-कोलेजमध्ये जावे लागते. त्यामुळे या गाड्या लवकरात लवकर पुन्हा सुरू कराव्या, अशी विनंती खा. श्यामकुमार बर्वे यांनी लोकसभेत केली.

खा. बर्वे यांनी सांगितले की, नागपूर-रामटेक लोकसभा मतदारसंघातील अनेक रेल्वे गाड्या कोरोना काळात बंद करण्यात आल्या होत्या. दोन-अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतरही या गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सध्या ४१ रेल्वे प्रकल्प स्वीकृत असून त्यासाठी ८१ हजार ८५० कोटींची गरज आहे. परंतु, बजेटमध्ये फक्त १५ हजार ५०० कोटी मंजूर झाले आहेत. त्यांनी तफावत अध्यक्ष महोदयांच्या लक्षात आणून दिली व यावर सरकारला जाब विचारला. २०१४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने रेल्वेच्या १७ प्रमुख क्षेत्रांना शंभर टक्के एफडीआयसाठी खुलं केले. रेल्वे आधुनिकीकरणाच्या नावावर खासगी कंपन्यांना मूल्यवान भूमी ४५ वर्षांच्या लीजवर दिल्या गेल्या या खासगीकरणाचा खा. बर्वे यांनी जाहीर विरोध दर्शविला.

विद्यार्थी सवलत सुरू करा

रेल्वेमध्ये वृद्धांसाठी कमी झालेला कोटा पुन्हा सुरू करावा आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा काळातील प्रवासादरम्यान मिळणारी सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही खा. बर्वे यांनी लोकसबा अध्यक्षांकडे केली.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर