शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

स्कूलबसबाबत गंभीर राहा; हायकोर्टाचा नागपुरातील शाळांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:52 IST

स्कूलबसवरील प्रकरणाबाबत गंभीर राहण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी शाळांना दिला.

ठळक मुद्देतांत्रिक मुद्यांवर आठ शाळांचे अर्ज

आॅनलाईन लोकमतनागपूर : स्कूलबसवरील प्रकरणाबाबत गंभीर राहण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी शाळांना दिला.स्कूलबस नियमांच्या अंमलबजावणीसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर न करणाऱ्या शाळांच्या यादीमध्ये चुकीने नाव आल्यामुळे नारायणा विद्यालय वर्धा रोड, तुली पब्लिक स्कूल, इनफन्ट जिसस स्कूल, जी. एच. रायसोनी विद्यानिकेतन हिंगणा रोड यांच्यासह एकूण आठ शाळांनी न्यायालयात अर्ज सादर करून संबंधित यादीतून नाव वगळण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करून शाळांचे कान टोचले. हे प्रकरण सर्वांनी गांभिर्याने घ्यावे. अन्यथा यापुढे निर्ढावलेपणा खपवून घेतला जाणार नाही असे शाळांना सुनावण्यात आले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.स्कूलबस नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या शाळांच्या बसेस येत्या १० जानेवारीपासून बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे संबंधित शाळांचे धाबे दणाणले आहे. उर्वरित शाळांना कोणत्याही परिस्थितीत १० जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाची नाराजी दूर करावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्या स्कूलबसेसची चाके थांबविली जाऊ शकतात. या आदेशाची माहिती शाळांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षण उपसंचालकांवर सोपविण्यात आली आहे.यासंदर्भात न्यायालयात २०१२ पासून जनहित याचिका प्रलंबित असून विद्यार्थ्यांना बसची सुविधा देणाऱ्या १३७ शाळांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. सुरुवातीला न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर एकाही शाळेने स्वत: किंवा वकिलामार्फत न्यायालयात उपस्थित होऊन उत्तर दाखल केले नव्हते. त्यानंतर शाळांना उत्तरासाठी अंतिम संधी देण्यात आली होती. त्या आदेशाचेही शाळांनी पालन केले नाही. परिणामी न्यायालयाने प्रत्येक शाळेवर पाच हजार रुपये दावा खर्च बसवून उत्तर सादर करण्यास सांगितले. दरम्यान, काही शाळा न्यायालयात हजर झाल्या. उर्वरित शाळांना उपस्थित करण्यासाठी न्यायालयाने मुख्याध्यापक व संस्थाध्यक्षांविरुद्ध वॉरन्ट जारी केला. परिणामी, आणखी काही शाळा न्यायालयात धावत आल्या. त्यानंतर उर्वरित शाळांचा दावा खर्च दहा हजार रुपये करण्यात आला. असे असतानाही काही शाळा न्यायालयात हजर झालेल्या नाहीत. त्या शाळांच्या स्कूलबसेसवर १० जानेवारीपासून कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात अ‍ॅड. फिरदोस मिर्झा न्यायालय मित्र असून त्यांना अ‍ॅड. तेजस देशपांडे यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा