शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राज्य शासनाचा अध्यादेश : खाद्यान्नात भेसळीसाठी आजीवन कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 7:45 PM

खाद्यान्नात भेसळ आणि भेसळयुक्त खाद्यान्न विक्री करताना दोषी आढळल्यास आजीवन कारावासाची तरतूद राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशात केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देव्यापारी संघटनांमध्ये भितीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खाद्यान्नात भेसळ आणि भेसळयुक्त खाद्यान्न विक्री करताना दोषी आढळल्यास आजीवन कारावासाची तरतूद राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशात केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.अनेकदा कोणताही कायदा तयार करताना वा लागू करताना आणि त्याची अंमलबजावणी करताना संबंधित संघटनांशी चर्चा करण्यात येते. पण अध्यादेश काढताना राज्य शासनाने कुणाशीही चर्चा केलेली नाही. दूधात भेसळीच्या गंभीर घटनानंतर राज्य शासनाने अध्यादेश काढण्याची माहिती आहे.नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे सचिव शिव प्रताप सिंह लोकमतशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच-अ दि. २० नोव्हेंबर २०१८ नुसार इंडियन पिनल कोड १९७३ च्या सेक्शन २७२ व २७३ मध्ये संशोधन केले आहे. याशिवाय देशात खाद्य सुरक्षा अधिनियम-२००६, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावात अन्य विकसित देशांच्या खाद्य कायद्यावर आधारित आहे. हा कायदा भारतात आयातीत करण्यात आला आहे. त्यामध्ये देशाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक परिस्थिती विचारात घेण्यात आलेली नाही. हा कायदा देशाची आधारभूत संरचना आणि सुविधेविना लागू करण्यात आला आहे.केवळ महाराष्ट्रात कायदासिंह म्हणाले, खाद्य भेसळ प्रतिबंधक कायदा देशात खाद्य पदार्थांचे सायन्स बेस्ड स्टॅण्डर्ड लागू करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. परंतु वास्तविकता अशी आहे की, हा कायदा ५ आॅगस्ट २०११ पासून लागू केल्यापासून त्याअंतर्गत सायन्स बेस्ड स्टॅण्डर्ड तयार करण्यात आलेले नाही. धान्य, डाळ, फळे, अधिकांश किराणा वस्तू आदी कृषी आधारित वस्तू असल्यामुळे अनेकदा नैसर्गिक कारणांमुळे पदार्थांचे नमूने फेल होतात. या नैसर्गिक कारणांसाठी व्यापाऱ्यांना जबाबदार ठरविले जाते. हा माल शेतकरी वा एपीएमसीतून खरेदी केला जातो. व्यापाऱ्यांची यात कोणतीही चूक नसतानाही खाद्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत निर्धारित परिमाणांवर जर त्यांच्यातर्फे विकलेल्या मालाचे नमूने नैसर्गिक कारणांमुळे फेल होत असेल तर व्यापाऱ्यांना दोषी ठरवून आजीवन कारावासाची तरतूद करणे न्यायसंगत नाही.खाद्य सुरक्षा अधिनियम हा केंद्र सरकारचा कायद आहे. पण त्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपविली आहे. या कायद्यांतर्गत आजीवन कारावासाची तरतूद संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रात लागू करणे चुकीचे आहे. व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता लागू करण्यात आलेला कायद्याचा व्यापाऱ्यांचा विरोध असून त्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे.असोसिएशनचे अध्यक्ष भंवरलाल जैन यांनी व्यापाऱ्यांना भयमुक्त करण्यासाठी या संशोधनावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाने कायदा शिथिल न केल्यास व्यापारी राज्यव्यापी आंदोलन करतील, अशा इशारा जैन यांनी दिला आहे. अधिकारी कायद्याची भिती दाखवून व्यापाऱ्यांचे शोषण करतील आणि इन्सपेक्टर राज वाढेल, शिवाय व्यवसायावर विपरित परिणाम होण्याची भिती आहे.या संदर्भात असोसिशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व ग्राहक सुरक्षा मंत्री गिरीश बापट यांना निवेदन देऊन कायद्यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :foodअन्नState Governmentराज्य सरकार