शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

power crisis : कोरोना संक्रमणाच्या काळात राज्यात आता विजेचेही संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 1:08 AM

power crisis : मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. ग्राहकांकडून देयकांचे पैसे न मिळाल्याने महावितरणने महाजनकोला रक्कम दिली नाही.

- कमल शर्मा

नागपूर : कोरोनासोबत लढणाऱ्या महाराष्ट्रापुढे आता विजेचे संकट उभे राहिले आहे. राज्यातील सर्वच वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. एक दिवस जरी कोळसा पुरवठा प्रभावित झाला तर वीज केंद्र बंद पडू शकतात, अशी स्थिती आहे. यातच पुन्हा भारनियमनाचे संकटही राज्यावर आहे.मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. ग्राहकांकडून देयकांचे पैसे न मिळाल्याने महावितरणने महाजनकोला रक्कम दिली नाही. कोळसा कंपन्यांवरील देणीही १,८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. वेकोलिसह अन्य कोळसा कंपन्यांचे कामकाज यामुळे प्रभावित झाले आहे. परिणामत: कोळसा पुरवठ्याची साखळी प्रभावित झाली आहे. राज्यातील ६ ते ७ वीज केंद्रांमधील कोळशाचा साठा जेमतेम तीन दिवस पुरेल, एवढाच उरला आहे. फक्त चंद्रपूर केंद्राकडे ७ दिवस पुरेल एवढा साठा असला तरी ही संवेदनशील स्थिती समजली जात आहे. महाजनकोच्या मते, दोन दिवसांपूर्वीच कोळसा कंपन्यांना देणी असलेल्या १,८०० कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपये अदा केले. तरीही दर महिन्यात ७०० ते ८०० कोटी रुपयांचे नियमित बिल तयार राहते. या काळात राज्यातील वीज केंद्रांना कमी प्रमाणात कोळशाचा पुरवठा केला जात आहे. रोजची सरासरी १.३० लाख टन कोळशाची मागणी असली तरी, पुरवठा ५० टनाचाच करावा लागत आहे. यामुळे वीज केंद्र चालविणे कठीण झाले आहे.

‘त्या’ कर्जासाठी राज्याची गॅरंटी हवीवीज कंपन्यांना या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, राज्य सरकारने हे कर्ज घेतलेले नाही. सूत्रांच्या मते, या कर्जासाठी राज्य सरकारच्या गॅरंटीची गरज आहे. दरम्यान, गुरुवारी उच्चस्तरीय समितीची बैठक होण्याची शक्यता असून, या बैठकीनंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर परिस्थिती मांडून सरकारकडे मदत मागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPower Shutdownभारनियमन