शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

power crisis : कोरोना संक्रमणाच्या काळात राज्यात आता विजेचेही संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 01:12 IST

power crisis : मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. ग्राहकांकडून देयकांचे पैसे न मिळाल्याने महावितरणने महाजनकोला रक्कम दिली नाही.

- कमल शर्मा

नागपूर : कोरोनासोबत लढणाऱ्या महाराष्ट्रापुढे आता विजेचे संकट उभे राहिले आहे. राज्यातील सर्वच वीज निर्मिती केंद्रांमधील कोळशाचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. एक दिवस जरी कोळसा पुरवठा प्रभावित झाला तर वीज केंद्र बंद पडू शकतात, अशी स्थिती आहे. यातच पुन्हा भारनियमनाचे संकटही राज्यावर आहे.मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली आहे. ग्राहकांकडून देयकांचे पैसे न मिळाल्याने महावितरणने महाजनकोला रक्कम दिली नाही. कोळसा कंपन्यांवरील देणीही १,८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. वेकोलिसह अन्य कोळसा कंपन्यांचे कामकाज यामुळे प्रभावित झाले आहे. परिणामत: कोळसा पुरवठ्याची साखळी प्रभावित झाली आहे. राज्यातील ६ ते ७ वीज केंद्रांमधील कोळशाचा साठा जेमतेम तीन दिवस पुरेल, एवढाच उरला आहे. फक्त चंद्रपूर केंद्राकडे ७ दिवस पुरेल एवढा साठा असला तरी ही संवेदनशील स्थिती समजली जात आहे. महाजनकोच्या मते, दोन दिवसांपूर्वीच कोळसा कंपन्यांना देणी असलेल्या १,८०० कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपये अदा केले. तरीही दर महिन्यात ७०० ते ८०० कोटी रुपयांचे नियमित बिल तयार राहते. या काळात राज्यातील वीज केंद्रांना कमी प्रमाणात कोळशाचा पुरवठा केला जात आहे. रोजची सरासरी १.३० लाख टन कोळशाची मागणी असली तरी, पुरवठा ५० टनाचाच करावा लागत आहे. यामुळे वीज केंद्र चालविणे कठीण झाले आहे.

‘त्या’ कर्जासाठी राज्याची गॅरंटी हवीवीज कंपन्यांना या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, राज्य सरकारने हे कर्ज घेतलेले नाही. सूत्रांच्या मते, या कर्जासाठी राज्य सरकारच्या गॅरंटीची गरज आहे. दरम्यान, गुरुवारी उच्चस्तरीय समितीची बैठक होण्याची शक्यता असून, या बैठकीनंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर परिस्थिती मांडून सरकारकडे मदत मागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPower Shutdownभारनियमन