शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दवाखाना आपल्या दारी अभियानाला राज्य शासनाची मंजूरी

By आनंद डेकाटे | Updated: November 10, 2023 16:39 IST

जिल्ह्यातील दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणार

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला आधुनिक तत्पर व शासकीय खर्चात उच्च दर्जाचे आरोग्य कवच देणाऱ्या शासन आपल्या दारी अभियानाला जिल्ह्यामध्ये राबविण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.छत्रपती सभागृहामध्ये जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी उपस्थितांना ही माहिती दिली. नागपूर जिल्ह्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून सुरु करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तातडीची तसेच गंभीर आजाराला प्रतिबंध करणारी, आगाऊ माहिती देणारी यंत्रणा विकसित करण्याबाबत जिल्हाधिकारी प्रयत्नरत होते. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

- काय आहे योजना

प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम राबविणे, माता, बाल मृत्यूदर कमी करणे, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, ३० वर्षावरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब वर्षातून एकदा तपासणी करणे, कर्करोग पूर्व तपासणी ५ वर्षातून एकदा करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबविणे त्याचबरोबर अन्न, पोषण, स्वच्छता याबाबतीत जनजागृती, बालकांचे व मातांचे लसीकरण, गावपातळीवर करणे , सुदृढ समाजाची निर्मिती करणे, आरोग्यप्रती ग्रामपातळीवर प्रत्येक नागरिकात जागरुकता निर्माण करणे, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड काढणे हे या योजनेचे मुळ उद्दीष्ट आहे.

- कशी करणार अंमलबजावणी

आरोग्यवाहिनी नावाच्या वाहनामध्ये औषधांच्या साठ्यासह डॉक्टरांची उपलब्धता ठेवण्यात येणार आहे. यासाठी २६ आरोग्यवाहिनी वाहन तयार करण्यात आले आहे. आरोग्यवाहिनीच्या सोबतीला गावपातळीवरील यंत्रणादेखील नियोजित कार्यक्रमानुसार त्या-त्या गावात उपस्थित राहणार आहेत. वैद्यकीय सुविधांसोबतच त्या मिळविण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक तसेच लिपीकवर्गीय मनुष्यबळदेखील उपलब्ध केले जाणार आहे. किती लोकांची रोज तपासणी झाली, त्याचे अहवाल दिवसाला तयार होणार असून जीपीएस प्रणालीद्वारे जिल्हा यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवणार आहे.

- कोण ठेवणार नियंत्रण

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणात ही योजना गावात राबविली जाणार आहे. अंगणवाडी सेविका व गावपातळीवरील आशा व अन्य कर्मचारी यामध्ये कार्यरत असतील. सोयीच्या ठिकाणी आरोग्यवाहिनी गावात पोहोचेल व प्राथमिक तपासण्या करेल. तपासणीअंती रुग्णांना गरज वाटल्यास संदर्भसेवा देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान मार्फत ही नाविन्यपूर्ण योजना राबविली जाणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकारSocialसामाजिक