शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

वेतनासाठी एसटी कामगार संघटनेने केला आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 00:18 IST

No wages , ST workers' union protested एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन अडकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी एसटी कामगार संघटनेने आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला होता.

ठळक मुद्देतीन महिन्याचे वेतन थकीत : घरासमोर, कार्यालयात आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन अडकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी एसटी कामगार संघटनेने आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रोश आंदोलन केले. पदाधिकारी, कार्यकर्ते संघटनेच्या कार्यालयात जमले. त्यांनी वेतनासाठी नारेबाजी केली. जे कर्मचारी घरी आहेत त्यांनी कुटुंबीयांसह घराच्या गेटसमोर येऊन नारेबाजी केली.

एसटी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन रखडले आहे. हे वेतन मिळण्यासाठी एसटी कामगार संघटनेने वेळोवेळी महामंडळाकडे पाठपुरावा केला. परंतु कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी प्रशासनाने काहीच पाऊल उचलले नाही. त्यामुळे एसटी कामगार संघटनेने ७ तारखेला वेतन न झाल्यास ९ तारखेला आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळपासून आक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली. पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या घराच्या गेटसमोर येऊन नारेबाजी केली. सोबतच संघटनेच्या कार्यालयातही पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. संघटनेच्या आंदोलनामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्यात येईल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. यावेळी संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय सचिव पुरुषोत्तम इंगोले, विभागीय अध्यक्ष प्रशांत बोकडे, विभागीय कार्याध्यक्ष जगदीश पाटमासे, रवी सोमकुवर, प्रशांत उमरेडकर, पद्माकर चंदनखेडे, मो. इम्रान, माधुरी ताकसांडे, मनोज बगले, एन. डी. गणेश, प्रमोद बीडकर, गणेश मेश्राम, मो. आरिफ, गजू शेंडे, योगेश उकंडे, मनोज श्रीवास्तव यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण?

तीन महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे एसटीचे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील जळगाव येथील मनोज चौधरी या वाहकाने सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूस महाराष्ट्र शासन व एसटी प्रशासन जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. तर रत्नागिरी येथील चालक पांडुरंग गडगे यांनीही आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली आहे. वेतन नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागत असून कुटुंबासमोर तसेच समाजासमोर त्यांची नाचक्की होत आहे. त्यामुळे शासनाने थकबाकीसह एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची गरज असल्याचे मत एसटी कामगार संघटनेचे नागपूर प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :state transportएसटीEmployeeकर्मचारीagitationआंदोलन