शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

काँग्रेसचा स्थापना दिवस यंदा नागपुरात होणार, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 16:54 IST

या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नागपूर : काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिन सोहळा २८ डिसेंबरला नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नागपुरात काँग्रेस पक्षातर्फे मोठी रॅलीही आयोजित केली जाणार असून, त्यात पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. 

या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देखील स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या रॅलीत सहभागी होतील. तसेच, या रॅलीमध्ये १० लाखांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत.

वेणुगोपाल यांनी बुधवारी (१३ डिसेंबर) संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून भाजपवर निशाणा साधला आणि संसदेवर दोनदा हल्ला झाल्याचे सांगितले. केंद्रात भाजपची सत्ता असताना हे दोन्ही हल्ले झाले. संसदेत काय चालले आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे, असेही ते म्हणाले. तसेच, भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवालही वेणुगोपाल यांनी केला. ते म्हणाले की, भाजपाच्या राजवटीला जनता कंटाळली आहे.

दरम्यान, संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत विरोधी पक्ष सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन देण्याची मागणी करत आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते गिरिराज सिंह यांनी वेळ येऊ द्या, ते प्रत्येक गोष्टीचे उत्तर देऊ. विरोधकांना संसद गहाण ठेवायची आहे, असे म्हटले आहे. "तुकडे तुकडे गँग गृहमंत्र्यांकडे जाब विचारत आहे. तपास पूर्ण होऊ द्या, तुकडे तुकडे टोळीला चोख प्रत्युत्तर मिळेल. दहशतवादी आणि अतिरेक्यांना जात नसते", असे ट्विटद्वारे गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेnagpurनागपूरSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी