शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नागपुरातील  घनकचरा व्यवस्थापन; २६८.६८ कोटींचा डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 22:47 IST

Solid waste management स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी २६८.६८ कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल (डीपीआर) स्वच्छ महाराष्ट्र अभियान उच्चाधिकार समितीने मंजूर केला आहे.

ठळक मुद्देकचऱ्यावरील प्रक्रियेची समस्या मार्गी लागणार :कंपोस्ट खत व बायो सीएनजी निर्माण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी २६८.६८ कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल (डीपीआर) स्वच्छ महाराष्ट्र अभियान उच्चाधिकार समितीने मंजूर केला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान प्राप्त व्हावे, यासाठी आधी मनपाने ३३९ कोटीचा डीपीआर तयार केला होता. त्यात आवश्यक बदल करून अंतिम डीपीआर तयार केला आहे. यात शहरात दररोज निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारतर्फे महापालिकेला व्हीजीएफ अंतर्गत आधी ९६.२२ कोटी प्राप्त झाले आहे. उर्वरित निधीचे समायोजन कसे होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. २२ जूनला होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यावेळी डीआरची स्थिती स्पष्ट होईल. परंतु या डीपीआरमुळे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची प्रश्न मार्गी लागणार आहे.

या प्रकल्पांतर्गत दररोज निघणाऱ्या कचऱ्यापैकी २०० मेट्रिक टन कचऱ्यापासून कंपोस्ट खत, ३००मेट्रिक टन कचऱ्यापासून बायो गॅस, बायो सीएनजी निर्माण होईल. कन्स्ट्रक्शन व डिमोलिशन वेस्ट ट्रीटमेंट प्लांट उभारला जाणार आहे. शहरात निघणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान उच्चाधिकार समितीने २२ मार्च २०१६ च्या बैठकीत डीपीआरला मंजुरी दिली होती. नियम व शर्थीनुसार संबंधित डीपीआरमध्ये सुधारणा करून २६८.६८ कोटीचा सुधारित डीपीआर मंजूर करण्यात आला आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पापूर्वी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. नंतर हा प्रस्ताव रद्द करण्यात आला त्या ऐवजी बायो गॅसपासून बायो सीएनजी, कंपोस्ट खत, एमआरएफ, आरडीएफ सेंट्रलाईज्ड प्लांट , ग्रीन वेस्ट प्रोसेसर आदीची व्यवस्था केली जाणार आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहात सादर केला जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. प्रकल्पाचे काम सुरू होण्याला ८ ते १० महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी मनपाला ९६.२२ कोटी प्राप्त झाले आहे.

प्रकल्पातील महत्वाचे घटक

प्रकल्पात कचरा संकलन व वाहतुकीसाठी १४३.२५ कोटी, रस्ते सफाई १.८३ कोटी, २००मेट्रिक टन क्षमतेच्या कंपोस्ट खत प्रकल्पासाठी ६ कोटी, कन्स्ट्रक्शन व डिमोलिशन वेस्ट ट्रीटमेंट प्लांटसाठी १६.६५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर ओल्या कचऱ्यापासून ऑर्गेनिक वेस्ट पासून बायोगॅसच्या माध्यमातून सीएनजी गॅस निर्माण केला जाईल. यासाठी ७५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. एमआरएफ व आडीएफ सेंट्रलाईज्ड प्लांटसाठी ६ कोटी जनावरांच्या अंतिम संस्कारासाठी ३.५ कोटीची तरतूद आहे. त्याशिवाय कचरा डबे, वाहने, मशीन आदीसाठी आर्थिक तरतूद आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न