शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपुरातील  घनकचरा व्यवस्थापन; २६८.६८ कोटींचा डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 22:47 IST

Solid waste management स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी २६८.६८ कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल (डीपीआर) स्वच्छ महाराष्ट्र अभियान उच्चाधिकार समितीने मंजूर केला आहे.

ठळक मुद्देकचऱ्यावरील प्रक्रियेची समस्या मार्गी लागणार :कंपोस्ट खत व बायो सीएनजी निर्माण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी २६८.६८ कोटींचा सुधारित प्रकल्प अहवाल (डीपीआर) स्वच्छ महाराष्ट्र अभियान उच्चाधिकार समितीने मंजूर केला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान प्राप्त व्हावे, यासाठी आधी मनपाने ३३९ कोटीचा डीपीआर तयार केला होता. त्यात आवश्यक बदल करून अंतिम डीपीआर तयार केला आहे. यात शहरात दररोज निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारतर्फे महापालिकेला व्हीजीएफ अंतर्गत आधी ९६.२२ कोटी प्राप्त झाले आहे. उर्वरित निधीचे समायोजन कसे होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. २२ जूनला होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यावेळी डीआरची स्थिती स्पष्ट होईल. परंतु या डीपीआरमुळे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची प्रश्न मार्गी लागणार आहे.

या प्रकल्पांतर्गत दररोज निघणाऱ्या कचऱ्यापैकी २०० मेट्रिक टन कचऱ्यापासून कंपोस्ट खत, ३००मेट्रिक टन कचऱ्यापासून बायो गॅस, बायो सीएनजी निर्माण होईल. कन्स्ट्रक्शन व डिमोलिशन वेस्ट ट्रीटमेंट प्लांट उभारला जाणार आहे. शहरात निघणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान उच्चाधिकार समितीने २२ मार्च २०१६ च्या बैठकीत डीपीआरला मंजुरी दिली होती. नियम व शर्थीनुसार संबंधित डीपीआरमध्ये सुधारणा करून २६८.६८ कोटीचा सुधारित डीपीआर मंजूर करण्यात आला आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पापूर्वी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. नंतर हा प्रस्ताव रद्द करण्यात आला त्या ऐवजी बायो गॅसपासून बायो सीएनजी, कंपोस्ट खत, एमआरएफ, आरडीएफ सेंट्रलाईज्ड प्लांट , ग्रीन वेस्ट प्रोसेसर आदीची व्यवस्था केली जाणार आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहात सादर केला जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. प्रकल्पाचे काम सुरू होण्याला ८ ते १० महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी मनपाला ९६.२२ कोटी प्राप्त झाले आहे.

प्रकल्पातील महत्वाचे घटक

प्रकल्पात कचरा संकलन व वाहतुकीसाठी १४३.२५ कोटी, रस्ते सफाई १.८३ कोटी, २००मेट्रिक टन क्षमतेच्या कंपोस्ट खत प्रकल्पासाठी ६ कोटी, कन्स्ट्रक्शन व डिमोलिशन वेस्ट ट्रीटमेंट प्लांटसाठी १६.६५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर ओल्या कचऱ्यापासून ऑर्गेनिक वेस्ट पासून बायोगॅसच्या माध्यमातून सीएनजी गॅस निर्माण केला जाईल. यासाठी ७५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. एमआरएफ व आडीएफ सेंट्रलाईज्ड प्लांटसाठी ६ कोटी जनावरांच्या अंतिम संस्कारासाठी ३.५ कोटीची तरतूद आहे. त्याशिवाय कचरा डबे, वाहने, मशीन आदीसाठी आर्थिक तरतूद आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न