शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

...तर कॉंग्रेसने देशात संविधान समानपणे का लागू केले नाही?; मोदींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 07:39 IST

पंतप्रधान मोदींचा सवाल : विराेधक गरिबांची प्रगती पाहू शकत नाहीत

योगेश पांडे/जितेंद्र ढवळेलोकमत न्यूज नेटवर्ककन्हान (जि. नागपूर) : एनडीएला देशात चारशे जागा मिळाल्या तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान धोक्यात येईल, असा अपप्रचार कॉंग्रेस व विरोधकांकडून केला जात आहे. मात्र ६० वर्षे कॉंग्रेसने आंबेडकरांनी दिलेले संविधान समानपणे लागू का केले नाही, असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. रामटेक मतदारसंघातील कन्हान येथे बुधवारी आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते.

कन्हानमधील ब्रुक बाँड मैदानात आयोजित या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री व भाजपचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

मी राजकारणात आलो तेव्हापासून त्यांनी प्रत्येक निवडणुकीत विरोधकांनी संविधानाचाच मुद्दा आणला. यातूनच त्यांची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येत आहे. हे लोक गरिबांची प्रगती पाहू शकत नाहीत. आणीबाणीच्या वेळी देशातील लोकशाही धोक्यात आली नव्हती का आणि गरीबाचा मुलगा सत्तेत आल्यावरच त्यांना संविधानावर संकट आले असल्याचे दिसले का असा सवाल त्यांनी केला. 

विरोधकांना शक्ती मिळाली तर देशाला खंडित करतीलइंडी आघाडीवाले पूर्ण ताकदीने देशातील लोकांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जनता एकजूट झाली तर त्यांचे राजकारण संपेल, याची त्यांना जाण आहे. विरोधकांना शक्ती मिळाली, तर ते देशाला खंडित करतील. विरोधक सनातनवर हल्ला करत असून, हिंदू धर्माच्या शक्तीला समाप्त करू इच्छितात, असा आरोप पंतप्रधानांनी केला.

कॉंग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण संपविलेस्वातंत्र्यानंतर काँग्रेसने षडयंत्र करून सातत्याने एससी, एसटी, ओबीसी समाजाला विकासापासून दूर ठेवले. अगदी बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारणदेखील संपविले व त्यांना भारतरत्नपासून वंचित ठेवले. विरोधक सीएएचा विरोध करत आहेत. कारण, याचे सर्वांत मोठे लाभार्थी बौद्ध, दलित आहेत, असा दावा पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानांनी पूर्ण ऐकले गडकरी, मुख्यमंत्र्यांचे भाषणसर्वसाधारणत: पंतप्रधानांच्या सभेमध्ये त्यांचे आगमन झाल्यावर स्वागत झाल्यानंतर थेट त्यांच्या भाषणाला सुरुवात होते. मात्र कन्हानच्या सभेत पंतप्रधानांनी नितीन गडकरी व मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण ऐकले व त्यानंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली. यामुळे मंचावरील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

काय म्हणाले मोदी...n१९ एप्रिलला तुम्हाला केवळ खासदार निवडायचा नाही; तर पुढील हजार वर्षांच्या भारताचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे. nजेव्हा विरोधक मला किंवा माझ्या आई-वडिलांना शिवीगाळ करतात, तेव्हा आमचे सरकार येणार हे समजून घ्या.nरालोआ सरकारने सर्वाधिक ओबीसी मंत्री देशाला दिले.nकाँग्रेसने जाणूनबुजून संपूर्ण देशात बाबासाहेबांचे संविधान लागू होऊ दिले नव्हते.nकाश्मीरमधून कलम ३७० हटल्यानंतर तेथील एससी, एसटी यांना हक्क मिळाले.nरामायण व बुद्धिस्ट सर्किटमुळे पर्यटनाचा विस्तार होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाnagpurनागपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४