शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

...तर ट्रॅफिक पोलिसावरच उलटणार ‘ई-चालान’! अतिरिक्त महासंचालकांनी दिला असा आदेश

By नरेश डोंगरे | Updated: September 7, 2022 13:24 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ट्रॅफिक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. पोलीस वाहनचालकाला ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा वाहनाची कागदपत्रे मागतात.

नागपूर: ई-चालानची कारवाई करताना स्वत:च्या मोबाइलचा वापर केल्यास ट्रॅफिक पोलिसावरच ही कारवाई बुमरँग होणार आहे. राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी तसे इशारा वजा सूचना देणारे पत्र राज्यातील सर्व पोलीस मुख्यालयांना पाठविले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ट्रॅफिक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. पोलीस वाहनचालकाला ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा वाहनाची कागदपत्रे मागतात.  अनेक वाहनचालक लायसेन्स किंवा गाडीची कागदपत्रेही नाही, असे सांगून कारवाईतून निसटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहतूक पोलीस ई-चालान बनवितात. पुरावा म्हणून स्वत:च्या मोबाइलमधून त्या वाहनाचा अन् नंबरप्लेटचा फोटो घेतात. बरेचवेळा हा ‘डाटा’ त्या पोलिसाच्या मोबाइलमध्येच अनेक दिवस पडून असतो अन् नंतर सवडीनुसार तो डाटा ट्रॅफिकच्या सिस्टिममध्ये अपलोड केला जातो. त्याआधारे दंडात्मक कारवाईची रक्कम जमा करण्यासाठी संबंधित वाहनधारकाला नोटीस पाठविली जाते. मात्र, हा प्रकार त्रुटीयुक्त असल्यामुळे अनेकदा वाहन एकाचे अन् दंड दुसऱ्याला असे प्रकार घडतात. संबंध नसताना चालान (नोटीस) आल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतो. प्रत्येक शहरातून अशा तक्रारी वारंवार ट्रॅफिक मुख्यालयात येतात. काही जण वरिष्ठांकडेही पुराव्यासह तक्रारी करतात. मात्र, त्याचा फायदा होत नाही. चूक नसताना निरपराध वाहनधारकाला दंडाची रक्कम भरावी लागते. 

 काय आहे पत्रात?- हा प्रकार अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांच्याकडे गेला. त्यांनी त्याची गंभीर दखल घेत राज्यातील पोलीस प्रमुखांना, वाहतूक शाखेच्या प्रमुखांना एक पत्र पाठविले. - त्यानुसार, यापुढे ट्रॅफिक पोलिसांनी ई-चालानच्या कारवाईसाठी स्वत:च्या मोबाइलचा वापर करू नये, त्याऐवजी चालान मशीनचा वापर करावा, अशी कडक सूचना या पत्रातून दिली. - याकडे दुर्लक्ष करून जो कुणी पोलीस स्वत:च्या मोबाइलमधून ई-चालानची कारवाई करेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

चालान मशीनमार्फतच - डीसीपी आवाड -    या आदेशाची गंभीर दखल घेण्यात आली असून शहर वाहतूक शाखेचे पोलीस चालान मशीनच्या माध्यमातूनच ई-चालानची कारवाई करणार आहेत, अशी प्रतिक्रिया या संबंधाने वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. आमच्याकडे ३०० चालान मशिन्स असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर