शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
3
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
4
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
5
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
6
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
7
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
8
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
9
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
10
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
11
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
12
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
13
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
14
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
15
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
17
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
18
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
19
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
20
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

अशोच चव्हाण उलटं बोलले, एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव.. भाजपचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 16:20 IST

एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन अशोक चव्हाण संभ्रम निर्माण करत असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नागपूर : भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला असून यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरे आमच्याकडे काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, असं म्हणायला पाहिजे होतं. पण त्यांनी वाक्य उलटं म्हटलं. कारण तेव्हा शिवसेना एकनाथ शिंदे नव्हे तर उद्धव ठाकरे चालवत होते, असा पलटवार बावनकुळे यांनी केला. 

ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ महाराष्ट्र (आफ्रोह) या संघटनेतर्फे संविधान चौकात जात प्रमामणपत्र पडताळणी समिती विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या विरोधात उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

२०१४ वा २०१९ मध्ये भाजपविरोधात जे काही कट कारस्थान झाले, त्याला शिवसेना पक्षप्रमुखांचे संरक्षण होते. कारण प्रमुख व्यक्तीचे समर्थन असल्याशिवाय काहीच होत नाही. उद्धव ठाकरेंनीच तो कट केला असेल, म्हणून अस झालं असावं, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. 

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे ५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास निघाले होते. असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडींकडे लक्ष घातले असता लक्षात येते की, याच काळात चंद्रकांत खैरे ॲक्टीव झाले आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्‍वासू आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे, असे म्हणत त्यांनी खैरेंवर टीका केली. 

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही अस अशोक चव्हाणांनी म्हटलं.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना