शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

अशोच चव्हाण उलटं बोलले, एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरेंचं नाव.. भाजपचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 16:20 IST

एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन अशोक चव्हाण संभ्रम निर्माण करत असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नागपूर : भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला असून यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंऐवजी उद्धव ठाकरे आमच्याकडे काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते, असं म्हणायला पाहिजे होतं. पण त्यांनी वाक्य उलटं म्हटलं. कारण तेव्हा शिवसेना एकनाथ शिंदे नव्हे तर उद्धव ठाकरे चालवत होते, असा पलटवार बावनकुळे यांनी केला. 

ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन ऑफ महाराष्ट्र (आफ्रोह) या संघटनेतर्फे संविधान चौकात जात प्रमामणपत्र पडताळणी समिती विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या विरोधात उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपोषण मंडपाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

२०१४ वा २०१९ मध्ये भाजपविरोधात जे काही कट कारस्थान झाले, त्याला शिवसेना पक्षप्रमुखांचे संरक्षण होते. कारण प्रमुख व्यक्तीचे समर्थन असल्याशिवाय काहीच होत नाही. उद्धव ठाकरेंनीच तो कट केला असेल, म्हणून अस झालं असावं, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. 

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे ५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास निघाले होते. असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडींकडे लक्ष घातले असता लक्षात येते की, याच काळात चंद्रकांत खैरे ॲक्टीव झाले आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्‍वासू आहोत, हे सिद्ध करण्यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे, असे म्हणत त्यांनी खैरेंवर टीका केली. 

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

भाजपा-शिवसेना युती काळात शिवसेनेने युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. शिवसेना नेत्यांनी माझी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती. भाजपासोबत राहायचे नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला परंतु ही भूमिका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाची होती असा खुलासा त्यांनी केला. तसेच याप्रकारचं सरकार स्थापन करायचं असेल तर तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असं मी शिवसेना नेत्यांना म्हटलं. परंतु ते पवारांना भेटले नाहीत त्यांचे पुढे काय झालं याबाबत माहिती नाही अस अशोक चव्हाणांनी म्हटलं.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना