शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

उपराजधानीत काविळसदृश आजाराचे सहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:01 AM

वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवाडीत उद्रेक नगर परिषदेकडे सक्षम आरोग्य यंत्रणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान तीन वर्षापासून वाडीला नगर परिषद घोषित केल्याने नगर परिषदेकडे आरोग्य यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली आहे.आंबेडकरनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही नाल्यातून गेली आहे. तसा वाडी परिसराला वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसापासून वेणा जलाशयातून पाणी बंद केले आहे. त्यामुळे टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. टँक रद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याने काविळ परिसरात पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसापासून आजार पसरले असून स्वाती गायकवाड यांना नुकत्याच जुळ्या मुली झाल्या होत्या. तेव्हापासूनच आई आणि दोघी जुळ्या मुली काविळसदृश आजाराने ग्रस्त होत्या.या तिघांचाही मृत्यू काविळने झाल्याचे बोलले जात आहे. काविळचा प्रकोप वाढत असल्याचे लक्षात घेता, जि.प.च्या आरोग्य विभागाने वाडीमध्ये इपॅडेमिक सेल तयार केला आहे. दोन डॉक्टरची तिथे नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर आशा वर्करच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला आहे. ग्रा.पं.ला मेडिक्लोर दिले असून, पाणी उकळून व गाळून पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नाल्यातून गेलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी दिली आहे.

आरोग्य यंत्रणा उभी करावीवाडीमध्ये यापूर्वीही साथ रोग पसरला होता. डेंग्यूचे रुग्णही आढळून आले होते. वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाला आहे. पण नगर परिषदेची स्वत:ची आरोग्य यंत्रणा नाही. त्यामुळे दरवेळी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग धावपळ करून आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. वाडीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाल्याने नगर परिषदेने स्वत:ची आरोग्य यंत्रणा उभी करावी, अशी मागणी आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी करण्यात आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य