शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कोरोनामुळे नागपूर विभागात उद्योगांची सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 12:58 PM

कोरोना महामारीमुळे मार्चच्या अखेरच्या आठवड्यात नागपूर विभागातील उद्योगांची जवळपास ६ हजार कोटींची उलाढाल (विक्री) ठप्प राहिली. यामुळे ८२० कोटींचे जीएसटी कलेक्शन कमी झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे मार्चचा अखेरचा आठवडा कारखाने सुरू झाल्यानंतरच होणार करवसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीमुळे मार्चच्या अखेरच्या आठवड्यात नागपूर विभागातील उद्योगांची जवळपास ६ हजार कोटींची उलाढाल (विक्री) ठप्प राहिली. यामुळे ८२० कोटींचे जीएसटी कलेक्शन कमी झाल्याची माहिती आहे. यापैकी एकट्या बुटीबोरी इंडस्ट्रियल एरियात जवळपास १५०० कोटींची उलाढाल ठप्प राहिली. त्यातून शासनाचे जीएसटीचे १८० कोटींचे नुकसान झाले आहे. इंडस्ट्रीयल एरियामध्ये बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसी, कळमेश्वर आणि अन्य एरियातील उद्योगांचा समावेश आहे.बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सीए मिलिंद कानडे म्हणाले, लॉकडाऊन पुन्हा वाढावा, अशी कोणत्याही उद्योजकांची मनस्थिती नाही. कारण कारखाने बंद राहिल्याने सर्वच उद्योजकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय राज्य शासनाकडेही पैसा नाही. करवसुली ठप्प आहे. कारखान्यांचे लॉकडाऊन हटवून उत्पादन सुरू करण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. अनेकांच्या कारखान्यांमध्ये फिनिश उत्पादन आहेत. विक्री न झाल्याने जवळपास सर्वच कारखान्यांत १५ दिवसांचा स्टॉक पडून आहे. मार्चमध्ये बिल बनविता आले नाही. लॉकडाऊन उठल्यानंतर यंत्राची निगा राखून कारखाने हळूहळू सुरू करावे लागतील. उत्पादन सुरळीत होण्यासाठी १५ दिवस लागणार आहेत. कारखान्यात उत्पादन सुरू झाल्यानंतरही मशीनवर कामगार दूरदूर असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार आहे. कामगारांचे पगार करायचे आहेत. त्याकरिता कारखाने सुरू होण्याची नितांत गरज आहे.बँकांची आर्थिक मदत मिळणारकानडे म्हणाले, उद्योग नव्याने सुरू करण्यासाठी लघु उद्योजकांकडे पैसे नाहीत. बँकांनी उद्योजकांना आर्थिक मदत करण्याचे रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक आले आहे. कमी व्याजदरात उद्योजकांना मदत मिळणार आहे. त्यानुसार बँकांकडून उद्योजकांना ३१ मार्चला फोन आले होते. लॉकडाऊन उठल्यानंतर ज्या उद्योजकाकडे बँकेचे एक कोटीचे खेळते भांडवल (सीसी) आहे, त्या उद्योजकाला ३० लाख रुपये बँका देणार आहेत. त्यातून कामगारांचे पगार आणि कच्च्या मालाची खरेदी होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कमी केल्याचा फायदा उद्योजकांना होणार आहे. कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू झाल्यानंतर राज्य शासनाला कर स्वरूपात महसूल मिळेल, असे कानडे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :businessव्यवसाय