शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

नियतीचा निर्दयी वार, आता कुणाचा आधार?

By योगेश पांडे | Updated: June 5, 2023 11:27 IST

एका क्षणात संपले कुटुंब, वृद्ध आईसह कुटुंबप्रमुखच उरले : दोन मुले, पत्नी, बहीण अन् साळी गमावली

योगेश पांडे

नागपूर : कुटुंबाच्या वंशाचा दिवा अन् सर्वांचा लाडका असलेल्या नातवांना घरचे लोक भेटतील म्हणून शनिवारपासून घरात उत्साहाचे वातावरण होते. नातवाला भेटण्याची इच्छा असतानादेखील गाडी लहान असल्याने ते घरीच थांबले अन् आपले आशीर्वाद कुटुंबीयांच्या माध्यमातून पाठविले. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच काही तरी होते अन् काही तासांतच क्रूर आघात झाला. आजोबांनी दिलेला आशीर्वाद तर नातवापर्यंत पोहोचलाच नाही. मात्र, प्रत्येक संकटात खंबीरपणे उभी राहिलेली पत्नी, दोन्ही मुले, सख्खी बहीण आणि नेहमी संकटकाळी धावून येणारी साळी यांच्या मृत्यूचीच वार्ता आली. अक्षरश: कानात शिसे ओतल्यासारखा अनुभव आला अन् काळ तेथेच स्तब्ध व्हावा हाच विचार डोक्यात आला. आता त्यांच्या मनात एकच विचार, मला अन् माझ्या वृद्ध आईला आता आधार कुणाचा राहणार? एका क्षणात संपूर्ण कुटुंब गमावल्याने भानावर आल्यापासून चंदननगर निवासी विजय राऊत यांच्या डोळ्यातील अश्रू आटले होते अन् माझ्या वृद्ध आईला एकटा आधार कसा देऊ, ही एकच चिंता त्यांच्या काळजाला पोखरत होती.

चंदननगरातील शिवगौरी मंदिराजवळ राहणाऱ्या राऊत कुटुंबातील मुलगा रोहन (३०), ऋषिकेश (२८), त्यांची आई गीता (५२), आत्या सुनीता रूपेश फेंडर (४०), तिची मुलगी यामिनी (९), मावशी प्रभा शेखर सोनवाने (३५) यांचा ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे अपघातातमृत्यू झाला. त्यांच्या कारला ट्रॅव्हल्सची जोरदार धडक बसली. यात कारमधील पाच जण जागीच ठार झाले, तर यामिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता कुटुंबात केवळ विजय आणि त्यांची आई लक्ष्मीबाई हेच उरले आहेत. आमच्या तरुण मुलांना नेण्याऐवजी आम्हाला का नेले नाही, हाच दोघांचा नियतीला सवाल होता. विजय यांना दोनदा अर्धांगवायूचा झटका आला होता. अनेक संकटांतून बाहेर निघाल्यावरदेखील ते नातू परत सोबत राहायला येईल या आशेने मुख्य प्रवाहात परतले होते.

कुटुंब जोडायला गेले अन् कायमचेच ‘गेले’

रोहन व ऋषिकेश हे खासगी काम करायचे. मागील अडीच वर्षांपासून रोहन व त्याच्या पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होता व ती वर्षभरापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही येथे माहेरी राहत होती. विजय हे दर महिन्यात नातवाला भेटायला जात होते आणि सुनेला घरी येण्याची विनंती करायचे. मुलाची खूप आठवण येत असल्याने रोहनने शनिवारी परिचिताची कार आणली. पुतण्याला भेटायचे म्हणून ऋषिकेशनेदेखील जाण्याचा आग्रह केला. तर, सुनेला समजविण्यासाठी विजय यांच्या पत्नी गीता, बहीण सुनीता व साळी प्रभा हेदेखील निघाले. कुटुंब जोडण्यासाठी सर्व जण गेले. मात्र, त्यांचा हा प्रवास अखेरचाच ठरला.

सौख्य काही काळाचेच

सुनीता फेंडर यांनी काही काळाअगोदरच इंदिरानगर भागात मोठ्या कष्टाने घर बांधले होते. पतीजवळ एका मुलीला ठेवून त्या दुसऱ्या मुलीसह गेल्या आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला. नवीन घराचे त्यांचे सौख्य काही काळाचेच ठरले.

ट्रॅव्हल्सने कारला उडवले; नागपूरचे सहाजण ठार, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

चंदननगरात शोककळा

राऊत कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बेताचीच असली तरी परिसरातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या घरीच एक दर्गा होता व तेथील सर्व कामे ऋषिकेश व त्याचे वडीलच करायचे. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांनादेखील मोठा धक्का बसला आहे. काही तासांअगोदर निरोप घेऊन गेलेले हसतेखेळते कुटुंब अशा पद्धतीने विखुरल्यामुळे परिसरात शोककळा पसरली होती.

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूरnagpurनागपूरDeathमृत्यू