शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात एसआयआर लागू करण्याचा घाट ; नाना पटोले यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:41 IST

Nagpur : गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणसं मेलेली दाखवतात. सर्वोच्च न्यायालयात हे सर्व समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातही बिहारच्या धर्तीवर एसआयआर लागू करण्याचा घाट निवडणूक आयोगाने घातला आहे. राज्य निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तसे तोंडी आदेश दिले आहेत. येत्या १५ दिवसांत २००० सालची यादी बीएलओ, तहसीलदार आणि एसडीओकडून मागवण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप काँग्रेस नेते आ. नाना पटोले यांनी केला. या सर्व मतदार याद्या ग्रामपंचायतस्तरावर आधी जाहीर कराव्या नंतरच मंजुरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणसं मेलेली दाखवतात. सर्वोच्च न्यायालयात हे सर्व समोर आले आहे. हा मोदीचा फंडा आहे. आपल्या विचाराची मतं ठेवून बाकी नावे काढून टाकायची हा भाजपचा फंडा आहे. मत चोरी सुरू आहे, यावर लोकांनी जागरूक व्हावे. निवडणुका पारदर्शक व्हाव्या, असेही पटोले म्हणाले. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा कोणाचा नातेवाईक असेल. पुतळ्याची विटंबना केली, याचा निषेध करतो. हे राज्य सरकारचे अपयश आहे. ते विषयाला डायव्हर्ट करत आहेत. 

भुजबळ यानी नौटंकी सोडावी

छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत. भांडण लावून महाराष्ट्र विकला जात आहे. स्कॉलरशिप दिल्या जात नाही, जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा, काय निर्णय घ्यायचा हे भुजबळ यांनी ठरवावे. सामाजिक असमतोल बिघडवण्याचे काम सरकार करत आहे. यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे आहेत. भुजबळ यांनी आता नौटंकी करणे सोडावे. निर्णय काय घ्यायचा तो घ्या; पण जनतेची दिशाभूल करू नका, अशी टीकाही पटोले यांनी केली. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेnagpurनागपूरcongressकाँग्रेस