शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:36 PM

शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअनिल देशमुख : शेतीमालाला हमीभाव व नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जमाफीची घोषणा झाली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाही. ते तातडीने जमा करण्यात यावे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या बोंडअळी पॅकेजमध्ये काटोल व नरखेड तालुक्यांचा समावेश करण्यात यावा. २०१४ या वर्षात देण्यात आलेल्या मदतीप्रमाणे गारपीटग्रस्तांना मदत देण्यात यावी. तूर व चण्याची शासनाने खरेदी सुरू करावी. शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा. रेशनवर देण्यात येणारा मका बंद करून गहू देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसंदर्भात ५१ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.भाजपा सरकारकडून घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात काहीच करीत नाही. शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात काटोल व नरखेड तालुक्यात अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यात २०१४ साली गारपीट झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून संत्रा,मोसंबीला प्रति एकरी ५० हजार, गहू, तूर, चणा व भाजीपाला पिकाला सरसकट प्रति एकरी ३० हजारांची मदत जाहीर केली होती. यावेळी किमान त्याधर्तीवर मदत द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली.बोंडअळीमुळे काटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही या दोन्ही तालुक्यांना राज्य सरकाराच्या पॅकेजमधून वगळण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर पुन्हा सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यात मदत जमा झालेली नाही. अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची मदत जमा झालेली नाही. हमीभावाचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या चार वर्षात यावर कोणताही निर्णय झालेला नाही. हमीभावाने तूर व चणा खरेदीची घोषणा केली. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अजूनही खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडू उमरकर, चंद्रशेखर चिखले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक मोहिते, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे,अनुप खराडे, बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, राष्ट्रवादीचे काटोलचे अध्यक्ष गणेश चन्ने, युवक अध्यक्ष गणेश सावरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखnagpurनागपूर