पाेलिसांकडून राजभवनाची घेराबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:09 AM2021-01-17T04:09:26+5:302021-01-17T04:09:26+5:30
नागपूर : काँग्रेस पक्षातर्फे राजभवनाला घेराव घालण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजभवनाची घेराबंदी केली होती. राजभवनाच्या चारही बाजूंचे रस्ते ...
नागपूर : काँग्रेस पक्षातर्फे राजभवनाला घेराव घालण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजभवनाची घेराबंदी केली होती. राजभवनाच्या चारही बाजूंचे रस्ते सील करण्यात आले होते.
१२०० पाेलीस जवानांना राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्यामुळेच काही कार्यकर्त्यांनी राजभवनात जाण्याचा प्रयत्न केला असता ते यशस्वी होऊ शकले नाही.
शनिवारी सकाळपासून जपानी गार्डन, बिजलीनगर, काटोल रोड आणि बालाेद्यानकडून राजभवनाकडे जाणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: बंदाेबस्ताचे नेतृत्व केले. आंदाेलनकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी गुप्त पाेलिसांना तैनात करण्यात आले होते. आंदाेलनांची प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात टिपण्यात येत होती. शिवाय एसआरपीच्या दाेन कंपन्यांसह वरुण, वज्र, क्विक रिस्पाॅन्स टीम आणि मोबाईल सर्विलान्स वाहन तैनात होते.