शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

धक्कादायक ! नागपूर जिल्ह्यातील सुराबर्डी तलावात मिसळतेय शौचालयातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 7:11 PM

Nagpur News नागपूरजवळ असलेल्या सुराबर्डी तलावात संडास व मूत्रीघरातले पाणी मिसळत असल्याची बाब समोर आली असून, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात याचिकातलावातील पाण्याचा नागरिकांना पुरवठा

नागपूर : तब्बल ७५.३९ हेक्टर परिसरात पसरलेल्या आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवीत असलेल्या सुराबर्डी तलावामध्ये शौचालय व मूत्रीघरातील पाणी मिसळत आहे. याशिवाय जनावरांच्या गोठ्यांतील घाण व स्मशानभूमीतील राखही तलावात फेकली जात आहे. परिणामी, हा तलाव प्रदूषित झाला आहे.

शेतकरी नितीन शेंद्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, निष्काळजी व उदासीनता यांमुळे हा भव्य व आकर्षक तलाव कायमचा निरुपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. लावा-सुराबर्डी पाणीपुरवठा योजनेंतर्गत परिसरातील अनेक गावांना या तलावाचे पाणी पुरविले जाते. असे असतानाही तलाव संपवला जात आहे.

सुराबर्डी गावातील सांडपाणी तलावात सोडले जात आहे. त्यासोबत संडास व मूत्रीघरातील घाण तलावात मिसळत आहे. तलावाजवळ जनावरांचे गोठे आहेत. तेथील घाणदेखील तलावात टाकली जात आहे. याशिवाय गावातून तलावाकडे जाणाऱ्या ६० मीटर रुंदीच्या पांधन रोडवर अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्यामुळे केवळ १० फूट रुंदीचा रस्ता मोकळा राहिला आहे. परिणामी, या रस्त्यावर अपघात वाढले आहेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

राज्य सरकारला नोटिस

या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने याचिकेतील आरोप गंभीरतेने घेऊन राज्य सरकार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदींना नोटीस बजावली व यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. सुधीर मालोदे तर, सरकारतर्फे ॲड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण