शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

धक्कादायक! ६०० घोटाळेबाज कर्मचाऱ्यांवर झाली नाही कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 9:08 PM

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमातील तरतुदीमुळे गेल्या पाच वर्षांत ५९८ घोटाळेबाज सरकारी कर्मचारी कारवाईच्या पाशातून सुटले आहेत. शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करण्यास झालेल्या चार वर्षांवर विलंबाचा फायदा त्यांना मिळाला आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही धक्कादायक माहिती दिली. सदर माहिती अपूर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नियमाचे संरक्षण मिळालेल्या घोटाळेबाज कर्मचाऱ्यांचा आकडा यापेक्षा मोठा आहे हे येथे उल्लेखनीय.

ठळक मुद्देहायकोर्टात आकडेवारी सादर : चार वर्षावर विलंबाचा मिळाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमातील तरतुदीमुळे गेल्या पाच वर्षांत ५९८ घोटाळेबाज सरकारी कर्मचारी कारवाईच्या पाशातून सुटले आहेत. शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करण्यास झालेल्या चार वर्षांवर विलंबाचा फायदा त्यांना मिळाला आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही धक्कादायक माहिती दिली. सदर माहिती अपूर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नियमाचे संरक्षण मिळालेल्या घोटाळेबाज कर्मचाऱ्यांचा आकडा यापेक्षा मोठा आहे हे येथे उल्लेखनीय.आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध, तो सेवानिवृत्त झाल्यावर, चार वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी घडलेल्या घोटाळ्यामध्ये शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करता येणार नाही अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमात करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध तो सेवेत असतानाच शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई सुरू करणे आवश्यक आहे. त्यात विलंब होऊन नियम २७ मधील तरतूद लागू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करता येत नाही. मुख्य सचिवांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत विविध विभागांमधील घोटाळ्याच्या ३२६ प्रकरणांतील ५९८ कर्मचाऱ्यांना या तरतुदीचा लाभ देण्यात आला आहे. ही माहिती अपूर्ण असल्यामुळे हे आकडे यापेक्षा मोठे आहेत हे स्पष्ट होते.उत्तर उमरेड भागातील पाचगाव वनक्षेत्रात २००२ ते २०१२ या कालावधीत गिट्टीचे अवैध उत्खनन झाले. त्यामुळे सरकारचा २ कोटी ७५ लाख ३४ हजार रुपयांचा महसूल बुडाला. या घोटाळ्यात आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध भेदभावपूर्ण कारवाई झाल्याचे एका प्रकरणात निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. यात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्य सचिवांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. मूळ याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.विभागनिहाय आकडेवारीविभाग                                 प्रकरणे                     कर्मचारीजल संसाधन                          ३६                              १२४महसूल व वन                        ५०                               १०६गृह                                        ७४                              ८१पीडब्ल्यूडी                            ३०                              ४७नियोजन                               २३                               ४३कृषी व संलग्न                        १३                               ३५पाणी पुरवठा                        १३                                 ३४सार्वजनिक आरोग्य              २४                                ३०ग्राम विकास                         १७                                २२शालेय शिक्षण                     ०८                                १७सामाजिक न्याय                ०४                                   १४नगर विकास                     ०९                                 १०कौशल्य विकास                 ११                                  १०उच्च शिक्षण                      ०१                                   १०अन्न व नागरी पुरवठा         ०४                                  ०६वित्त                                  ०४                                 ०४सहकार व पणन                ०२                                  ०२सामान्य प्रशासन               ०१                                   ०१आदिवासी विकास           ०१                                    ०१वैद्यकीय शिक्षण               ०१                                  ०१------------------------------------------एकूण                            ३२६                                ५९८------------------------------------------

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी