शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

धक्कादायक! दहा वर्षात नागपुरातील ५० मुलांची विदेशात तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 8:19 PM

बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या  नागपुरातील १० दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकानाका भागातील रहिवासी असून, त्यांनी गेल्या १० वर्षात नागपुरातील ५० मुलांना इंग्लंड (यूके) विदेशात नेऊन सोेडल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देमानवी तस्करी करणारे १० दाम्पत्य ताब्यात : ब्रिटिश उच्चायुक्तांकडून माहिती

नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या  नागपुरातील १० दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकानाका भागातील रहिवासी असून, त्यांनी गेल्या १० वर्षात नागपुरातील ५० मुलांना इंग्लंड (यूके) विदेशात नेऊन सोेडल्याचा आरोप आहे. सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली.२००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या कालावधीत नागपुरातून विदेशात गेलेली ५० मुले पुन्हा भारतात परतलीच नसल्याची बाब ब्रिटिश उच्चायुक्तांच्या लक्षात आली. त्यांनी चौकशीनंतर सप्टेंबर २०१७ मध्ये हे गंभीर प्रकरण भारतीय उच्चायुक्तांसह दिल्ली दूतावासाला कळविले. दिल्लीतून नागपूर पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू झाली. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेतून त्या दहा दाम्पत्यांचा पत्ता आणि त्यांना शोधण्यात आले. ज्या कुटुंबातील मुले विदेशात पाठविण्यात आली, त्यांचीही चौकशी करण्यात आली. त्यांची कागदपत्रे तपासली असता आरोपींनी पासपोर्ट आणि व्हिसा तयार करण्यासाठी मिळवलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे लक्षात आले. ज्या शाळांची त्या कागदपत्रांवर नावे आहेत, त्या शाळा प्रशासनात पोलिसांनी चौकशी केली असता आम्ही ही कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाही, असे शाळा प्रशासनाने पोलिसांच्या लक्षात आणून दिले.एका मुलामागे दोन लाखया सर्व प्रकरणाची सविस्तर आणि सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी विदेशात गेलेल्या मुलांच्या पालकांकडे कसून चौकशी केली. मुलांना इंग्लंडमध्ये बक्कळ पगाराची नोकरी मिळते, असे आरोपी दाम्पत्य सांगायचे. त्यांना तिकडे पोहचवून देण्यासाठी आरोपी दाम्पत्य प्रत्येक मुलामागे त्यांच्या पालकांकडून दोन लाख रुपये कमिशन उकळत होते, असेही पुढे आले. त्यामुळे पालकही आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना तगडी रक्कम देत होते, असे स्पष्ट झाले. या एकूणच घटनाक्रमातून आरोपींनी फसवणूक करून मुलांना विदेशात नेल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे पाचपावली ठाण्यात या प्रकरणाचा आज गुन्हा दाखल करून १० ही जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.ब्रिटिश अधिकारी चक्रावलेप्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून आपल्या परिवारातील मुलांना विदेशात घेऊन जाणारी ही दहा आरोपी जोडपी भारतात परत येताना मुलांना विदेशातच सोडून परततात, हा पहिला संशयास्पद मुद्दा ठरला. विशेष म्हणजे, एका दाम्पत्याने चक्क १९ मुले विदेशात आपली मुले म्हणून नेऊन सोडली. एखाद्या दाम्पत्याला १९ मुले असू शकतात, हा मुद्दाच खटकणारा होता. त्यामुळे सखोल चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता कागदपत्रे बनावट असल्याचेही त्यांच्या ध्यानात आले. प्रत्येक मुलांमधील अंतर तीन ते सहा महिनेच (गर्भधारणेला नऊ महिने लागतात) असल्याचे पाहून ब्रिटिश अधिकारीही चक्रावले.आरोपी दाम्पत्यांची नावेकंसात त्यांनी विदेशात नेलेली मुलेगुरुमीत तसेच तिचा पती राजेंद्रसिंग अटवाल (८ मुले), परमजीत आणि तिचा पती रुल्डासिंग गुजर (१९ मुले), सुरिंदर आणि तिचा पती जर्नलसिंग धोत्रा (६ मुले), जगविंदरसिंग आणि पियरासिंग ( ६ मुले), परमजितसिंग आणि सतवीरसिंग धोत्रा (२ मुले), कुलजीत आणि मनजीतसिंग धोत्रा (३ मुले), सतवंतसिंग निशांतसिंग धोत्रा (३ मुले) मनजीत आणि काश्मीरसिंग धोत्रा (२ मुले), निर्मल आणि अजितसिंग (४ मुले) परविंदर आणि तिचा पती अजितसिंग (४ मुले) तसेच जसविंदरसिंग बलबीरसिंग मुलतानी (५ मुले).

 

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर