शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात त्यांचा पुतळा नसेल; उद्धव ठाकरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 05:38 IST

यवतमाळ हाऊस येथे विजय दर्डा यांची सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शिवसेनेचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईत साकारत असलेल्या स्मारकात त्यांचा पुतळा नसेल. त्याऐवजी बाळासाहेबांची कर्तबगारी नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे त्यांचे लिखाण, व्यंगचित्रे, तसेच त्यांचा सामाजिक, राजकीय व सृजनशील प्रवास मांडणारी छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती या माध्यमातून जागतिक दर्जाचे स्मारक उभे केले जात आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे दिली. 

लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांच्या यवतमाळ हाऊस या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव व तरुण नेते, माजी मंत्री आदित्य यांच्यासमवेत बुधवारी रात्री सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि नागपूर आवृत्तीचा ५१ वा वर्धापनदिन या निमित्ताने गेल्या आठवड्यात, २१ डिसेंबरला आयोजित स्नेहमिलन समारंभाला ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. आता विधान परिषदेतील कामकाजात सहभागी होण्यासाठी नागपूर मुक्कामी असताना त्यांनी दर्डा यांची सदिच्छा भेट घेतली. विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. निवांत गप्पा मारल्या.  

बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी ते म्हणाले की, हेरिटेज इमारत असलेल्या महापौर बंगल्याच्या परिसरात होणाऱ्या स्मारकाच्या उभारणीत त्या वास्तूचे पुरातत्त्वीय महत्त्व आणि बाळासाहेबांची कर्तबगारी या दोहोंची सांगड घालण्यात येत आहे. मूळ वास्तूच्या प्रांगणात तसेच खाली तळघरात दोन मजले असा या स्मारकाचा विस्तार असेल. तथापि, त्यांचा पुतळा या स्मारकात नसेल. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

जनसमर्थनाबद्दल चिंता नाही 

शिवसेनेतील बंडाळी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने चाळीसवर आमदारांनी नवा पक्ष स्थापन केल्याच्या मुद्यावर ठाकरे म्हणाले की, शिवसैनिकांच्या बळावर निवडून आलेले आमदार व खासदार पक्ष सोडून गेले असले तरी पक्षाच्या मूळ संघटनेला काहीही धक्का लागलेला नाही. उलट सामान्य जनतेत आमच्या पक्षाबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे पक्षाच्या भवितव्याबद्दल आपण निश्चिंत आहोत. त्यातही महाविकास आघाडीच्या रूपाने दोन्ही काँग्रेस आणि आमचा पक्ष राज्याचे भले करण्याच्या व्यापक हितासाठी एकत्र आल्यामुळे राज्यातील राजकारण बदलले आहे. 

तिन्ही पक्षांची वैचारिक बैठक वेगळी असल्यामुळे काही मुद्यांवर वेगवेगळ्या भूमिका असणे स्वाभाविक आहे; परंतु वादाचे मुद्दे व्यापक हितासाठी बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत आणि गेल्या काही महिन्यांमधील राजकीय घटनांमुळे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष अधिक जवळ आले आहेत. या एकसंधपणाचे चांगले परिणाम मुंबई महापालिका व येणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये नक्की दिसतील, असा दावा ठाकरे यांनी केला. 

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला तिलांजली 

- शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षाचा कारभार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही. 

- वैचारिक, पक्षीय लढाई आता वैयक्तिक आरोप व चारित्र्यहननाच्या पातळीवर पोहाेचली आहे. महाराष्ट्रात असे कधी झाले नाही. आमच्या घराण्याची चौथी पिढी आता राजकारणात आहे. 

- राजकारणाच्या पलीकडे वैयक्तिक व कौटुंबिक स्नेह जोपासण्याचा वारसा आधीच्या पिढ्यांनी आमच्या हाती सोपविला. त्याला छेद देणारे सध्याचे राजकारण सुरू आहे, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे