शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

ती थंडीपासून बचाव करण्यासाठी मृतदेहाला कवटाळून झोपत होती.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2023 20:39 IST

Nagpur News कठीण परिस्थितीमध्ये स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी कधी-कधी कसे कल्पनातीत व मानवी भावभावना विव्हळून जातील अशा पद्धतीने वागू शकतात, याचा एक थरारक अनुभव 'गूंज' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते अंशू गुप्ता यांनी येथे सांगितला.

नागपूर : देशातील हजारो व्यक्ती आजही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. असे व्यक्ती कठीण परिस्थितीमध्ये स्वत:ला जीवंत ठेवण्यासाठी कधी-कधी कसे कल्पनातीत व मानवी भावभावना विव्हळून जातील अशा पद्धतीने वागू शकतात, याचा एक थरारक अनुभव 'गूंज' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते अंशू गुप्ता यांनी शुक्रवारी नागपूर येथे सांगितला.

हा प्रसंग १९९९ मधील आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे दरवर्षी शेकडो बेघर नागरिकांचा मृत्यू होत होता. पोलिसांनी बेवारस नागरिकांचे मृतदेह गोळा करण्यासाठी क्षेत्रनिहाय मजूर नेमले होते. त्यांना एका मृतदेहासाठी २० रुपये दिले जात होते. दरम्यान, गुप्ता यांनी त्यापैकी एका मजुराची भेट घेतली. त्याच्याकडून बेघर नागरिकांच्या मृत्यूची कारणे माहिती करून घेताना त्याच्या मुलीने स्वत:संदर्भात हृदय हादरवून सोडणारा खुलासा केला. आवश्यक गरम कपडे नसल्यामुळे ती मुलगी रात्री कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बेवारस मृतदेहाला कवटाळून झोपत होती. या प्रसंगाने गुप्ता यांना आंतरबाह्य हलविले.

तेव्हापासून त्यांनी स्वत:चे जीवन गरजू व्यक्तींच्या उद्धारासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भक्कम पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून 'गूंज' या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था देशभरातील गरजूंना कपडे, घरगुती सामान, शैक्षणिक साहित्य आणि अन्नधान्य पुरविण्याचे कार्य करते.

हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने गुप्ता यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या प्रसंगाची माहिती देऊन गरजू नागरिकांच्या कल्याणाकरिता सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. देशात अनेक मोठ्या समस्या आहेत आणि त्या समस्या दूर करण्याचे उपायदेखील आपल्याकडे आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु, या गरजा संबंधित व्यक्तीचा आत्मसन्मान जपून पूर्ण केल्या गेल्या पाहिजे. त्यामुळेच आम्ही गरजू व्यक्तींकडून त्यांच्या क्षेत्रातील समस्या दूर करण्याचे काम करून घेतो व त्यानंतर त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करतो. त्यामधून संबंधित व्यक्तींमध्ये त्यांची गरज स्वत:च्या परिश्रमातून पूर्ण झाली, हा आत्मसन्मानाचा भाव निर्माण होतो, असे गुप्ता यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे व सचिव ॲड. अमोल जलतारे यांनी गुप्ता यांचे स्वागत केले तर, ॲड. अपूर्वा कोल्हे यांनी परिचय करून दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय