शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ती थंडीपासून बचाव करण्यासाठी मृतदेहाला कवटाळून झोपत होती.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2023 20:39 IST

Nagpur News कठीण परिस्थितीमध्ये स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी कधी-कधी कसे कल्पनातीत व मानवी भावभावना विव्हळून जातील अशा पद्धतीने वागू शकतात, याचा एक थरारक अनुभव 'गूंज' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते अंशू गुप्ता यांनी येथे सांगितला.

नागपूर : देशातील हजारो व्यक्ती आजही अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. असे व्यक्ती कठीण परिस्थितीमध्ये स्वत:ला जीवंत ठेवण्यासाठी कधी-कधी कसे कल्पनातीत व मानवी भावभावना विव्हळून जातील अशा पद्धतीने वागू शकतात, याचा एक थरारक अनुभव 'गूंज' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते अंशू गुप्ता यांनी शुक्रवारी नागपूर येथे सांगितला.

हा प्रसंग १९९९ मधील आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे दरवर्षी शेकडो बेघर नागरिकांचा मृत्यू होत होता. पोलिसांनी बेवारस नागरिकांचे मृतदेह गोळा करण्यासाठी क्षेत्रनिहाय मजूर नेमले होते. त्यांना एका मृतदेहासाठी २० रुपये दिले जात होते. दरम्यान, गुप्ता यांनी त्यापैकी एका मजुराची भेट घेतली. त्याच्याकडून बेघर नागरिकांच्या मृत्यूची कारणे माहिती करून घेताना त्याच्या मुलीने स्वत:संदर्भात हृदय हादरवून सोडणारा खुलासा केला. आवश्यक गरम कपडे नसल्यामुळे ती मुलगी रात्री कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बेवारस मृतदेहाला कवटाळून झोपत होती. या प्रसंगाने गुप्ता यांना आंतरबाह्य हलविले.

तेव्हापासून त्यांनी स्वत:चे जीवन गरजू व्यक्तींच्या उद्धारासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भक्कम पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून 'गूंज' या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. आज ही संस्था देशभरातील गरजूंना कपडे, घरगुती सामान, शैक्षणिक साहित्य आणि अन्नधान्य पुरविण्याचे कार्य करते.

हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने गुप्ता यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या प्रसंगाची माहिती देऊन गरजू नागरिकांच्या कल्याणाकरिता सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. देशात अनेक मोठ्या समस्या आहेत आणि त्या समस्या दूर करण्याचे उपायदेखील आपल्याकडे आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादी गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु, या गरजा संबंधित व्यक्तीचा आत्मसन्मान जपून पूर्ण केल्या गेल्या पाहिजे. त्यामुळेच आम्ही गरजू व्यक्तींकडून त्यांच्या क्षेत्रातील समस्या दूर करण्याचे काम करून घेतो व त्यानंतर त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करतो. त्यामधून संबंधित व्यक्तींमध्ये त्यांची गरज स्वत:च्या परिश्रमातून पूर्ण झाली, हा आत्मसन्मानाचा भाव निर्माण होतो, असे गुप्ता यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे व सचिव ॲड. अमोल जलतारे यांनी गुप्ता यांचे स्वागत केले तर, ॲड. अपूर्वा कोल्हे यांनी परिचय करून दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय