शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

'ती' दोषी नाही हो... तिला आयुष्यभर कैदेत ठेवू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 10:58 AM

तिला दोषी ठरवून आयुष्यभर कैदेत ठेवू नका, अशी कळकळीची विनंती सोमवारी पांढरकवडा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य समितीपुढे केली.

ठळक मुद्देवन अधिकाऱ्यांनी केली राज्य समितीपुढे कळकळीची विनंतीप्रकरण पांढरकवड्यातील वाघिणीचे

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ती’ खरोखरच दोषी नाही, तिने मुद्दाम महिलेवर हल्ला करून खाण्यासाठी ठार केले नाही. ठार करणे हा तिचा हेतू नव्हता. त्यामुळे तिला दोषी ठरवून आयुष्यभर कैदेत ठेवू नका, अशी कळकळीची विनंती सोमवारी पांढरकवडा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य समितीपुढे केली.हे प्रकरण पांढरकवडा येथून पकडून आणलेल्या टीटी-२सी-१ या वाघिणीच्या संदर्भातील आहे. या वाघिणीचा मानवी वस्तीत वावर वाढला होता. अलीकडेच एका महिलेवर हल्ला करून या वाघिणीने ठार केले होते. त्यामुळे जन आक्रोश लक्षात घेता तिला नागपुरात आणण्यात आले होते. सध्या ही वाघीण येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये देखरेखीखाली आहे. दोन दिवसांपूर्वीच वनमंत्री संजय राठोड यांनी सेंटरमध्ये येऊन या वाघिणीची माहिती अधिकाºयांकडून जाणून घेतली होती. मुख्यमंत्रीदेखील या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.या वाघिणीकडून माणसांवर हल्ले करण्याच्या दोन वेळा घटना घडल्याची नोंद वनविभागाच्या रेकॉर्डवर आहे. पहिल्या घटनेत तिने रस्त्यात आलेल्या एका व्यक्तीला पंजा मारला होता, तर दुसऱ्या घटनेमध्ये गेल्या आठवड्यात तिने एका महिलेवर हल्ला करून ठार केले. त्यामुळे या वाघिणीला कैदेत ठेवायचे की अन्य जंगलात निसर्गमुक्त करायचे याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, अनाथ वाघांच्या बछड्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या समितीसमोर आज सोमवारी पांढरकवड्याचे मुख्य वनसंरक्षक रामाराव आणि टिपेश्वर अभयारण्याचे डीएफओ पुरानिक यांनी बाजू मांडली. ही वाघीण निर्दोष असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

रस्त्यात आलेल्या महिलेला तिने तोंडाने पकडले नाही तर पंजा मारला. त्यानंतर, ती महिला मरण पावली. मात्र तासभर प्रेताजवळ बसूनदेखील या वाघिणीने प्रेत खाल्ले नाही. यावरून या वाघिणीचा हेतू महिलेला ठार करणे हा नव्हता, ती नरभक्षी ठरू शकत नाही, असे या अधिकाऱ्यांनी समितीचे अध्यक्ष अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक हुडा यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. पुराव्यादाखल त्यांनी मागील जून महिन्यापासूनचा या वाघिणीचा रेकॉर्डदेखील सादर केला. या काळात वाघिणीने कोणत्याही चुका केल्या नाहीत, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पांढरकवडा येथील दोन्ही अधिकाºयांची बाजू ऐकून घेतल्यावर समितीने या वाघिणीसंदर्भात अभिप्राय देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा या विषयावर समितीपुढे चर्चा होणार आहे. त्यामुळे या समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.अधिकार मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना प्रत्यक्षात या वाघिणीच्या शिक्षेसंदर्भात काय निर्णय घ्यावा, याचे अधिकार या समितीला नाही. केवळ ही वाघीण दोषी आहे की निर्दोष आहे हे ठरविण्याचे अधिकार फक्त या समितीला आहेत. त्यामुळे समितीच्या अभिप्रायानंतर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) हेच आपला कायदेशीर निर्णय घेऊ शकतात. त्यानंतरच यावर पुढील कार्यवाही होऊ शकते.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग