शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

आई झाली... पण जगली नाही ! पूर्व विदर्भातील आरोग्य व्यवस्थेचे चित्र भयावह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 11:03 IST

Nagpur : कोणत्याही दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये बाळाच्या आगमनाचा क्षण अतिशय आनंददायी असतो; पण काही घरांमध्ये हा क्षण काळवंडलेला आणि शोकपूर्णही ठरतो. कारण जी जन्म देते, ती आईच जगातून निघून जाते. आरोग्य व्यवस्था गावागावांत पोहोचल्याचा दावा करणाऱ्या आजच्या युगातही, बाळंतपणात मरण पावणाऱ्या मातांचा आकडा आपल्याला अस्वस्थ करतो. याला शहर व ग्रामीण भाग अपवाद नाही

राजेश शेगोकारनागपूर : सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मातामृत्यू प्रकरण गाजत असतानाच, विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांतही अशाच दोन वेदनादायक घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत एक समान धागा आहे, तो म्हणजे आरोग्य व्यवस्थेची बेफिकिरी आणि हलगर्जी.

पहिला घटना आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या प्रतिभा मुकेश उके (३०) यांची. प्रतिभा १० एप्रिल रोजी प्रसूतीसाठी दाखल झाल्या. २४ तास प्रयत्न करूनही सामान्य प्रसूती न झाल्याने, त्यांना दुसऱ्या दिवशी गोंदियातील गंगाबाई स्त्री रुग्णालयात हलवण्यात आले. १२ एप्रिलच्या रात्री २ वाजता प्रतिभाने सामान्य प्रसूतीत बाळाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर तीव्र रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. प्रकृती बिघडल्यामुळे सकाळी केटीएस रुग्णालयात हलवण्यात आले. दोन दिवस उपचार सुरू राहिले; पण १५ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पती मुकेश उके यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. दुसरी घटना गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याच्या विसोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत घडली. 

मनीषा धुर्वे (वय ३१) ही आदिवासी माता मध्यरात्री विसोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल झाली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सकाळपर्यंत प्रसूती होईल, असे सांगितले. सकाळ झाली; पण प्रसूती झाली नाही. नातेवाइकांनी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती केली. मात्र थांबण्याचा सल्ला देण्यात आला. दुपारी तीन वाजेपर्यंत प्रसववेदना तीव्र झाल्या; पण स्थिती सुधारली नाही. नंतर मात्र त्यांना तातडीने देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी ब्रह्मपुरीला रेफर करण्यास सांगितले; पण तेव्हाच मनीषा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. या दोन्ही घटना अपघात नाही, तर आरोग्य व्यवस्थेचे अपयश आहे. गडचिरोलीसह पूर्व विदर्भात अशा घटनांमध्ये सातत्य आहे. ग्रामीण भागात पोहोचलेल्या आरोग्य व्यवस्थेला अधिक जबाबदार करण्याची गरज यामधून अधोरेखित होते. अनेक आरोग्य केंद्रांत प्राथमिक उपचारही होत नाहीत; तसेच रुग्णाला योग्य सल्लाही दिला जात नाही. वेळेवर निर्णय न घेणे, अपुरा उपचार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची बेफिकिरी यांमधून झालेला मातृत्वाचा कडवट शेवट या घटनांमधून अधोरेखित झाला आहे. आता या दोन्ही प्रकरणांत दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. यशावकाश त्यामधून सत्य बाहेर येईल अन् आरोग्य व्यवस्थेला धडाही मिळेल; पण जीव गमावलेली माता परत येणार नाही.

 

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य