शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

आई झाली... पण जगली नाही ! पूर्व विदर्भातील आरोग्य व्यवस्थेचे चित्र भयावह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 11:03 IST

Nagpur : कोणत्याही दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये बाळाच्या आगमनाचा क्षण अतिशय आनंददायी असतो; पण काही घरांमध्ये हा क्षण काळवंडलेला आणि शोकपूर्णही ठरतो. कारण जी जन्म देते, ती आईच जगातून निघून जाते. आरोग्य व्यवस्था गावागावांत पोहोचल्याचा दावा करणाऱ्या आजच्या युगातही, बाळंतपणात मरण पावणाऱ्या मातांचा आकडा आपल्याला अस्वस्थ करतो. याला शहर व ग्रामीण भाग अपवाद नाही

राजेश शेगोकारनागपूर : सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मातामृत्यू प्रकरण गाजत असतानाच, विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांतही अशाच दोन वेदनादायक घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत एक समान धागा आहे, तो म्हणजे आरोग्य व्यवस्थेची बेफिकिरी आणि हलगर्जी.

पहिला घटना आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या प्रतिभा मुकेश उके (३०) यांची. प्रतिभा १० एप्रिल रोजी प्रसूतीसाठी दाखल झाल्या. २४ तास प्रयत्न करूनही सामान्य प्रसूती न झाल्याने, त्यांना दुसऱ्या दिवशी गोंदियातील गंगाबाई स्त्री रुग्णालयात हलवण्यात आले. १२ एप्रिलच्या रात्री २ वाजता प्रतिभाने सामान्य प्रसूतीत बाळाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर तीव्र रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. प्रकृती बिघडल्यामुळे सकाळी केटीएस रुग्णालयात हलवण्यात आले. दोन दिवस उपचार सुरू राहिले; पण १५ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पती मुकेश उके यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. दुसरी घटना गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्याच्या विसोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत घडली. 

मनीषा धुर्वे (वय ३१) ही आदिवासी माता मध्यरात्री विसोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल झाली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सकाळपर्यंत प्रसूती होईल, असे सांगितले. सकाळ झाली; पण प्रसूती झाली नाही. नातेवाइकांनी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती केली. मात्र थांबण्याचा सल्ला देण्यात आला. दुपारी तीन वाजेपर्यंत प्रसववेदना तीव्र झाल्या; पण स्थिती सुधारली नाही. नंतर मात्र त्यांना तातडीने देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी ब्रह्मपुरीला रेफर करण्यास सांगितले; पण तेव्हाच मनीषा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. या दोन्ही घटना अपघात नाही, तर आरोग्य व्यवस्थेचे अपयश आहे. गडचिरोलीसह पूर्व विदर्भात अशा घटनांमध्ये सातत्य आहे. ग्रामीण भागात पोहोचलेल्या आरोग्य व्यवस्थेला अधिक जबाबदार करण्याची गरज यामधून अधोरेखित होते. अनेक आरोग्य केंद्रांत प्राथमिक उपचारही होत नाहीत; तसेच रुग्णाला योग्य सल्लाही दिला जात नाही. वेळेवर निर्णय न घेणे, अपुरा उपचार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची बेफिकिरी यांमधून झालेला मातृत्वाचा कडवट शेवट या घटनांमधून अधोरेखित झाला आहे. आता या दोन्ही प्रकरणांत दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. यशावकाश त्यामधून सत्य बाहेर येईल अन् आरोग्य व्यवस्थेला धडाही मिळेल; पण जीव गमावलेली माता परत येणार नाही.

 

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य