शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर होणार राजकीय ‘धमाका’, शत्रुघ्न सिन्हा यांचे संकेत; यवतमाळ हाऊस येथे विजय दर्डा यांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 03:18 IST

लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली.

नागपूर : लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. रविवारी नागपुरात आले असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी यवतमाळ हाऊस येथे लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांची भेट घेतली. यावेळी दर्डा यांनी खा.सिन्हा व मुंबई कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम यांचे स्वागत केले.नागपुरात रविवारी उत्तर भारतीय सभेच्या माध्यमातून हिंदी भाषिक नेत्यांना एका मंचावर आणून हिंदी ‘व्होटबँक’ मजबूत करण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमासाठी शत्रुघ्न सिन्हा व संजय निरुपम आले होते.‘लोकमत’शी संवाद साधताना सिन्हा यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले. बिहारमध्ये भाजपासोबत हातमिळावणी केल्यानंतर नितीश कुमार यांना अस्वस्थता जाणवत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, ‘आरजेडी’प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासह विविध नेते एकत्र येत आहेत. भाजपाबाबत लोकांमध्ये संताप आहे. मीदेखील निर्णायक टप्प्यावर पोहोचलो आहे. मात्र पुढील पावलांबाबत योग्य वेळ आल्यावर दिवाळीनंतरच घोषणा करेल, असे सिन्हा यांनी सांगितले.दिल्ली व बिहार येथे भाजपाच्या झालेल्या पराभवावर बोलत असताना सिन्हा म्हणाले की, भाजपाविरोधात नकारात्मक वातावरण तयार होत आहे. तेथे पैसे खर्च केल्यानंतरदेखील भाजपाचा पराभव झाला.‘व्हीव्हीपॅट’मुळे पारदर्शकता येईल‘बॅलेट पेपर’च्या काळात ‘बूथ कॅप्चरिंग’ व्हायचे. आता ‘ईव्हीएम’चा काळ आहे. मात्र यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’सोबत ‘व्हीव्हीपॅट’ मशीन लावल्याने पारदर्शकता येईल. निवडणुकांचे निकाल पूर्णत: जनतेच्या हाती असतील, असे सिन्हा यांनी सांगितले.पाकिस्तानमध्ये इम्रान खान चक्रव्यूहात फसले आहेत. त्यांना ‘डेड इकॉनॉमी’ हाती मिळाली आहे. ते सैन्याच्या हातातील बाहुले आहेत. पाकिस्तानने चर्चेसाठी भारतासमोर हात पुढे केला होता. मात्र केंद्राने त्याला नकार दिला. हे पाऊल अयोग्य आहे. पाकिस्तान भिक्षा मागत आहे. तेथे केवळ दोन महिन्यांचेच धान्य उरले आहे, अशी भावना सिन्हा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Dardaविजय दर्डाShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा