शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दिवाळीनंतर होणार राजकीय ‘धमाका’, शत्रुघ्न सिन्हा यांचे संकेत; यवतमाळ हाऊस येथे विजय दर्डा यांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 03:18 IST

लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली.

नागपूर : लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. रविवारी नागपुरात आले असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी यवतमाळ हाऊस येथे लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांची भेट घेतली. यावेळी दर्डा यांनी खा.सिन्हा व मुंबई कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम यांचे स्वागत केले.नागपुरात रविवारी उत्तर भारतीय सभेच्या माध्यमातून हिंदी भाषिक नेत्यांना एका मंचावर आणून हिंदी ‘व्होटबँक’ मजबूत करण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमासाठी शत्रुघ्न सिन्हा व संजय निरुपम आले होते.‘लोकमत’शी संवाद साधताना सिन्हा यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले. बिहारमध्ये भाजपासोबत हातमिळावणी केल्यानंतर नितीश कुमार यांना अस्वस्थता जाणवत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, ‘आरजेडी’प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासह विविध नेते एकत्र येत आहेत. भाजपाबाबत लोकांमध्ये संताप आहे. मीदेखील निर्णायक टप्प्यावर पोहोचलो आहे. मात्र पुढील पावलांबाबत योग्य वेळ आल्यावर दिवाळीनंतरच घोषणा करेल, असे सिन्हा यांनी सांगितले.दिल्ली व बिहार येथे भाजपाच्या झालेल्या पराभवावर बोलत असताना सिन्हा म्हणाले की, भाजपाविरोधात नकारात्मक वातावरण तयार होत आहे. तेथे पैसे खर्च केल्यानंतरदेखील भाजपाचा पराभव झाला.‘व्हीव्हीपॅट’मुळे पारदर्शकता येईल‘बॅलेट पेपर’च्या काळात ‘बूथ कॅप्चरिंग’ व्हायचे. आता ‘ईव्हीएम’चा काळ आहे. मात्र यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’सोबत ‘व्हीव्हीपॅट’ मशीन लावल्याने पारदर्शकता येईल. निवडणुकांचे निकाल पूर्णत: जनतेच्या हाती असतील, असे सिन्हा यांनी सांगितले.पाकिस्तानमध्ये इम्रान खान चक्रव्यूहात फसले आहेत. त्यांना ‘डेड इकॉनॉमी’ हाती मिळाली आहे. ते सैन्याच्या हातातील बाहुले आहेत. पाकिस्तानने चर्चेसाठी भारतासमोर हात पुढे केला होता. मात्र केंद्राने त्याला नकार दिला. हे पाऊल अयोग्य आहे. पाकिस्तान भिक्षा मागत आहे. तेथे केवळ दोन महिन्यांचेच धान्य उरले आहे, अशी भावना सिन्हा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Dardaविजय दर्डाShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा