शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

यंदा पडणार कडाक्याची थंडी; वातावरणात गारवा वाढला, साथीला सर्दी-खोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 12:35 IST

सध्या दिवसा उन आणि रात्री गारवा अशा दुहेरी वातावरणाचा सामना करावा लागताे आहे

नागपूर : पावसाळा संपला तसा ऑक्टाेबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीची चाहुल लागली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते यावर्षी थंडीचा तडाखा अधिक जाणवणार आहे. वातावरणात गारवा वाढला आहे, तसे आजारांचे प्रमाणही वाढले असून घराेघरी सर्दी, खाेकल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

रविवारी नागपूरचे किमान तापमान १६.८ अंश नाेंदविण्यात आले. हे सरासरीच्या आसपास आहे. गुरुवार, शुक्रवारपेक्षा काही अंशाची त्यात वाढ झाली आहे. दिवसाचे कमाल तापमान ३०.८ अंश असून सरासरीपेक्षा १.५ अंशाने खाली आहे. नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तरी रात्री व दिवसाचा पारा याच सरासरीत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, गारठा हळूहळू वाढत चालला आहे. २०१२ पासून दशकभरात २०१९ साली सर्वाधिक आणि सर्वांत कमी तापमानाची नाेंद करण्यात आली हाेती. ४ ऑक्टाेबर २०१९ राेजी ते ३९.८ अंशावर हाेते आणि २५ ऑक्टाेबर २०१९ राेजी ते ११.६ अंशाच्या निच्चांकीवर हाेते. यावर्षी ऑक्टाेबर हिट ३५ अंशापर्यंत गेली आहे; पण १५ अंशाच्या खाली आले नाही. २७ ऑक्टाेबरला ते १५.२ अंशावर गेले हाेते.

दरम्यान, नाेव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पारा घसरण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये कडाक्याच्या थंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. या महिन्यात थंडीच्या दाेन लाटा येण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात तीव्रतेची जाणीव हाेईल.

ज्येष्ठांनी स्वत:ला जपावे

सध्या दिवसा उन आणि रात्री गारवा अशा दुहेरी वातावरणाचा सामना नागपूरकरांना करावा लागताे आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा त्रास अधिक हाेत आहे. घराेघरी सर्दी, खाेकला, तापाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. अशावेळी लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. मुलांना थंड पेय किंवा पाणी देऊ नये, त्यांना साखरेचे पदार्थ अधिक देऊ नये, ज्यामुळे जीवाणूजन्य आजार हाेण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. गारवा वाढत असल्याने उबदार कापडांच्या दुकानात लाेकांची गर्दीही वाढली आहे.

टॅग्स :weatherहवामानenvironmentपर्यावरणnagpurनागपूर