शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्र व संस्कृत भाषेची सेवा करा : जगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:22 IST

भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देकविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाषा ही देशाच्या अस्मितेचे प्रतीक असते. संस्कृत ही संस्कारांची भाषा आहे. संस्कृतच्या माध्यमातून लोक एकजूट व सुसंस्कृत होतात. हेच या भाषेचे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी देश व संस्कृत भाषा या दोघांचीही सेवा केली पाहिजे, असे मत रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय, चित्रकूट, उत्तर प्रदेश येथील कुलपतीजगद्गुरु रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी व्यक्त केले. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी हे होते तर ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर हेदेखील उपस्थित होते. मानवाचे जीवन हे यज्ञासारखे आहे. दीक्षेचा अर्थ स्वत:चा विचार न करता राष्ट्राला जीवन अर्पण करणे हा होता. वाईट गोष्टींपासून दूर राहणे हेच दीक्षाव्रताचे आचरण आहे. देश, आई-वडील, गुरू, अतिथी यांच्याप्रति असलेल्या कर्तव्यांचे योग्य पद्धतीने निर्वाहन करणे हाच दीक्षेचा उपदेश आहे, असे रामानंदाचार्यस्वामी रामभद्राचार्य यांनी सांगितले. डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी प्रास्ताविक केले.

मधुरा,श्रीवरदाला सर्वाधिक पदके
दीक्षांत समारंभात योग, योगविज्ञान, वास्तू, जर्मन, वेद, ग्रंथालयशास्त्र, ज्योतिष, कीर्तन, प्रशासकीय सेवा, शिक्षण, संगणक उपायोजन, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला व ललित कला यासारख्या ३५ विषयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ६२ पदके व २८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तर २३ संशोधकांना ‘पीएचडी’ प्रदान करण्यात आली. एम.ए.संस्कृत विषयात अव्वल राहिलेली मधुरा यशवंत कायंदे व श्रीवरदा श्रीपाद मालगे यांना प्रत्येकी सात पदके व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

गुणवंतांना बसला अव्यवस्थेचा फटका
दीक्षांत समारंभादरम्यान अव्यवस्थेमुळे गुणवंतांना नाहक मनस्ताप झाला. कार्यक्रम लवकर आवरता घेण्याच्या प्रयत्नात सात गुणवंतांना मंचावर बोलविण्याचाच प्रशासनाला विसर पडला. समारंभानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे याची तक्रार केली. यानंतर विद्यार्थ्यांना पदके व पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना मंचावर पदवी प्रदान करण्यात येत असताना इतर विद्यार्थीदेखील छायाचित्र काढण्यासाठी मंचावर चढले. अव्यवस्था दूर करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याने पुढाकार घेतला नाही.

 

टॅग्स :Kavi Kulguru Kalidas Sanskrit Universityकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठStudentविद्यार्थी