शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुलांना शाळेत पाठविता की ऑनलाईनचा पर्याय निवडता? निर्णय पालकांनाच घ्यायचा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 8:53 PM

Nagpur News मुलांना ‘शाळेत पाठविता की ऑनलाईनच शिकविता?’, हा निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांनी पालकांवर साेडली आहे. शाळांनी याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविले आहे.

ठळक मुद्दे शाळेत आल्यास पाळावे लागतील सर्व नियम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात शाळा सुरू करण्याचे निर्देश आले आहेत आणि त्यानुसार शाळा तयारीलाही लागल्या आहेत. मात्र, सुरक्षेची चिंता लक्षात घेत, ‘शाळेत पाठविता की ऑनलाईनच शिकविता?’, हा निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांनी पालकांवर साेडली आहे. शाळांनी याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविले आहे.

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आता कमजाेर हाेत असल्याचे दिसत असल्याने राज्य शासनाने ४ ऑक्टाेबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला व तसे निर्देश विविध जिल्ह्यांच्या प्रशासनाला दिले. शाळा सुरू करताना काेराेना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शाळांनीही आता तयारी चालविली आहे. मात्र, काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून पालकांमध्ये अद्याप भीती असून, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. मुलांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल करीत पालकांनी चिंता मांडली आहे. यावर शाळांनी एक ताेडगा काढला आहे. नागपूर शहरातील शाळा चालकांनी पालकांसमाेर दाेन्ही पर्याय ठेवले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा विद्यार्थ्यांची व्यवस्था करतील; पण हायजीनची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांवर राहील, असे शाळांनी स्पष्ट केले. शाळांनी पालकांना पत्र पाठवून शाळेत पाठविणे किंवा ऑनलाईन शिकविणे, यावर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. दाेन्ही पर्यायांसाठी शाळा तयार असून, निवडण्याची जबाबदारी पालकांवर अवलंबून राहील. पालकांनी तसा फाॅर्म भरून शाळेत सादर करायचा आहे. दरम्यान, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली ठरविली असून, त्याचे पत्रकही पालकांना साेपविण्यात आले आहे.

 

शाळेत याल तर हे नियम असतील

- दरराेज कपडे धुवावे लागणार असल्याने गणवेश बंधनकारक राहणार नाही. काेणतेही स्वच्छ कपडे घालून येता येईल.

- शाळेत असेपर्यंत विद्यार्थ्याने मास्क घालणे बंधनकारक असेल.

- मुलांनी घरूनच पुरेसे पिण्याचे पाणी आणावे.

- साेबत सॅनिटायझर ठेवून ते थाेड्या थाेड्या वेळाने वापरावे लागेल.

- पालकांनीच त्यांच्या पाल्यांना वेळेत शाळेत साेडावे लागेल आणि घरीही न्यावे लागेल.

- विद्यार्थ्यांनी वर्गात त्यांच्यासाठी ठरविलेल्या बेंचवरच बसायचे आहे.

 

काय करू नये

- मुलांनी त्यांची जागा साेडू नये.

- विद्यार्थ्यांनी जेवणाचा डबा शाळेत आणू नये. कारण मधली जेवणाची सुटी राहणार नाही.

- विद्यार्थ्याला किंवा घरच्या कुठल्याही सदस्याला आराेग्यविषयक समस्या असेल किंवा आजार असेल तर पालकांनी त्याला शाळेत पाठवू नये.

- पालकांनी शाळेच्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई असेल.

टॅग्स :Schoolशाळा