शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कागदावरच धावतेय ‘सेमी हायस्पीड ट्रेन’

By admin | Updated: February 19, 2015 02:07 IST

केंद्रातील मोदी सरकारने आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरवर कृपादृष्टी दाखवून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-बिलासपूरसाठी सेमी हायस्पीड...

नागपूर : केंद्रातील मोदी सरकारने आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरवर कृपादृष्टी दाखवून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-बिलासपूरसाठी सेमी हायस्पीड सेक्टर विकसित करण्याची घोषणा केली. या मार्गावर १६० ते २०० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वेगाडी धावणार होती. प्रवाशीही कमीतकमी वेळात आपला प्रवास पार पाडणार होते. परंतु आठ महिने उलटूनही हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिल्याची स्थिती आहे.केंद्र शासनाचा २६ फेब्रुवारी २०१५ रोजी सादर होणारा वर्ष २०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात सेमी हायस्पीड रेल्वेगाड्या चालविण्याविषयी काही ठोस घोषणा किंवा निधीची तरतूद होण्याची अपेक्षा आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी २०१४-१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात दिल्ली-आगरा, दिल्ली-कानपूर, दिल्ली-चंदीगड, चेन्नई-हैदराबाद, नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-बिलासपूर, मुंबई-गोवा मार्गावर प्रतितास १६० ते २०० किलोमीटर वेगाने सेमी हायस्पीड रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली होती. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर-सिकंदराबाद विभागात नागपूर ते बल्लारशापर्यंत १६०-२०० किलोमीटरच्या आधी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यासाठी रेल्वे रुळ, सिग्नल आणि इतर कामासाठी निधीचा तुटवडा पडला. या कामासाठी ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. १६० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्यासाठी २५० कोटींची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत आवश्यक ते सर्वेक्षण करून त्याचा अहवाल मुख्यालयामार्फत रेल्वे बोर्डाला पाठविला आहे. नि२धीच्या कमतरतेमुळे नागपूर-सिकंदराबाद सेमी हायस्पीड रेल्वे कागदावरच धावत असल्याची स्थिती आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर -बिलासपूर सेक्टरमध्ये नागपूर ते दुर्गपर्यंत आवश्यक सुधार कार्य केल्यानंतरच सेमी हायस्पीड रेल्वेगाड्या चालवू शकणार आहे. त्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. विभागाने सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठविला आहे. आगामी रेल्वे अर्थसंकल्पात या दोन्ही विभागांच्या अहवालास मंजुरी मिळून आवश्यक निधीची तरतूद झाल्यानंतरच हे प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)