शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पत्नीने गळफास घेतल्याचे दिसताच पतीचा घरातून पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 14:17 IST

नातेवाइकांचा घातपाताचा संशय : एकाच दिवशी दोन आत्महत्या

नागपूर : शहरातील दोन विवाहित महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना वाडी आणि वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. भोमेश्वरी मनोज रहांगडाले (वय २५, रा. सूरजनगर, भांडेवाडी) आणि प्रणाली सुशील घोडेस्वार (वय २५, पालकरनगर, आठवा मैल) असे आत्महत्या केलेल्या महिलांची नावे आहेत.

पहिल्या घटनेत वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोमेश्वरी आणि मनोज यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. ते मूळचे मध्यप्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी असून कामाच्या शोधात ते नागपुरात आले. मनोजला दारूचे व्यसन होते. मनोजच्या रोजच्या दारू पिण्यामुळे ती कंटाळली होती. तो दारू पिऊन रोज मारहाण करीत होता. त्यामुळे भोमेश्वरीने शनिवारी रात्री दहा वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दारूच्या नशेत असलेल्या मनोजला पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे त्याने घरातून पळ काढला. तो अद्यापही बेपत्ता असल्यामुळे नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

दुसऱ्या घटनेत प्रणाली आणि सुशील घोडेस्वार यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तेव्हापासून प्रणाली ही नेहमी आजारी राहत होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. सुशील हे आयुध निर्माणीत कामाला आहेत. रविवारी सकाळी दहा वाजता प्रणालीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर