शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

शेतकऱ्यांच्या घरापर्यंत बियाणे-खते पोहचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 21:48 IST

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी लागले आहे. पण कोरोनामुळे भीतीचे सावट ग्रामीण भागात पसरले आहे. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची साधने बंद आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी शहरात, तालुक्यात जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्था ‘आत्मा’अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी गटांची नोंदणी करण्यात आली आहे. हे शेतकरी गट सध्या कृषी विभागाला तसेच प्रशासनाला साहाय्य करीत आहे. कोरोनाची भीती शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण जनतेने गावाचे रस्तेसुद्धा बंद केले आहेत. बाहेरून कुणी गावात येऊ नये आणि गावातील कुणी बाहेर जाऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या खरीप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीचे काम सुरू केले आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी काही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पण त्यासाठी शहरात अथवा तालुक्यात जाऊन कृषी केंद्रातून ही खरेदी करायची आहे. दरम्यान, शेती साहित्य खरेदी करताना गर्दी होऊ नये, असा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे. शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकरी बांधवांना त्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पुरवठा करण्याकरिता नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी जिल्ह्यात एकूण २०१ गटांनी नोंदणी केलेली आहे. या गटांकडे शेतकऱ्यांनी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशकांची मागणी नोंदवायची आहे. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन आवश्यक आणि योग्य दरामध्ये कृषी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. गटाने खरेदी केलेले साहित्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचवून देण्यात येत आहे.त्यापैकी १७७ शेतकरी गटांकडे ३,१४२ शेतकऱ्यांनी ७००४ मेट्रिक टन खतपुरवठा करण्याकरिता मागणी नोंदवलेली आहे. आतापर्यंत २५ शेतकरी गटांनी ४०४ शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार ३९९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा केला आहे.गटाकडे मागणी नोंदणी केल्यानंतर आम्ही कृषी केंद्राशी चर्चा घडवून आणतो. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदी केली जाते. यामुळे गर्दी टाळता येते. वेळेत आणि पाहिजे तो माल मिळतो. शिवाय वाहतुकीचा खर्च कमी येतो.संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी