शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

शेतकऱ्यांच्या घरापर्यंत बियाणे-खते पोहचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 21:48 IST

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी लागले आहे. पण कोरोनामुळे भीतीचे सावट ग्रामीण भागात पसरले आहे. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची साधने बंद आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी शहरात, तालुक्यात जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्था ‘आत्मा’अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी गटांची नोंदणी करण्यात आली आहे. हे शेतकरी गट सध्या कृषी विभागाला तसेच प्रशासनाला साहाय्य करीत आहे. कोरोनाची भीती शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण जनतेने गावाचे रस्तेसुद्धा बंद केले आहेत. बाहेरून कुणी गावात येऊ नये आणि गावातील कुणी बाहेर जाऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या खरीप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीचे काम सुरू केले आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी काही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पण त्यासाठी शहरात अथवा तालुक्यात जाऊन कृषी केंद्रातून ही खरेदी करायची आहे. दरम्यान, शेती साहित्य खरेदी करताना गर्दी होऊ नये, असा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे. शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकरी बांधवांना त्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पुरवठा करण्याकरिता नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी जिल्ह्यात एकूण २०१ गटांनी नोंदणी केलेली आहे. या गटांकडे शेतकऱ्यांनी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशकांची मागणी नोंदवायची आहे. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन आवश्यक आणि योग्य दरामध्ये कृषी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. गटाने खरेदी केलेले साहित्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचवून देण्यात येत आहे.त्यापैकी १७७ शेतकरी गटांकडे ३,१४२ शेतकऱ्यांनी ७००४ मेट्रिक टन खतपुरवठा करण्याकरिता मागणी नोंदवलेली आहे. आतापर्यंत २५ शेतकरी गटांनी ४०४ शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार ३९९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा केला आहे.गटाकडे मागणी नोंदणी केल्यानंतर आम्ही कृषी केंद्राशी चर्चा घडवून आणतो. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदी केली जाते. यामुळे गर्दी टाळता येते. वेळेत आणि पाहिजे तो माल मिळतो. शिवाय वाहतुकीचा खर्च कमी येतो.संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी