शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावा; नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 10:37 AM

कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेल्या मास्कची तसेच नागरिकांनीही वापरलेल्या मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देनागरिकांनी वापरलेले मास्क रस्त्यावर टाकू नयेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेल्या मास्कची तसेच नागरिकांनीही वापरलेल्या मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.वापरलेल्या मास्कमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका विचारात घेता अशा मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची गरज आहे. कोरोना रु ग्णावर काम करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आलेले मास्क बायोवेस्टमध्ये टाकले जावे. सोबतच नागरिकांनीही वापरलेले मास्क कचºयात न टाकता ते योग्यप्रकारे कागदात गुंडाळून कचरापेटीतच टाकणे गरजेचे आहे.आमदार निवास व वनामती येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्यांनी वापरलेले मास्क गोळा करण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वाहनाद्वारे संकलित केले जातात. तसेच घरातच क्वारंटाईन करण्यात आलेल्यांकडे मास्क संकलित करण्यासाठी बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी जातात. त्यांच्याकडेच वापरलेले मास्क द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.नागरिकांनी मास्क रस्त्यांवर टाकू नयेकोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करीत आहेत. त्यांनी वापरलेले मास्क सार्वजनिक ठिकाणी वा रस्त्यावर न टाकता व्यवस्थित कागदात गुंडाळून कचरा संकलन गाडीत टाकावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस