शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

शाळा सुरू झाल्या, मात्र वीज पुरवठा खंडितच राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:12 IST

शिक्षणाचे गांभीर्य आता शासन आणि प्रशासनाला राहिलेले नाही. वृत्तपत्राच्या माध्यमातून जि.प.च्या शाळांच्या खंडित वीज पुरवठ्याबद्दल वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. मात्र आजही विजेअभावी त्या अंधारलेल्या आहेत. शाळांचे थकलेले वीज बिल भरण्यात आले नसल्याने शाळांमध्ये अंधार कायम आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा अंधारात असतानाही लोकप्रतिनिधीही त्याबाबत गंभीर नाही.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था : लोकप्रतिनिधीही गंभीर नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शिक्षणाचे गांभीर्य आता शासन आणि प्रशासनाला राहिलेले नाही. वृत्तपत्राच्या माध्यमातून जि.प.च्या शाळांच्या खंडित वीज पुरवठ्याबद्दल वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. मात्र आजही विजेअभावी त्या अंधारलेल्या आहेत. शाळांचे थकलेले वीज बिल भरण्यात आले नसल्याने शाळांमध्ये अंधार कायम आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा अंधारात असतानाही लोकप्रतिनिधीही त्याबाबत गंभीर नाही.जिल्हा परिषदेच्या सुमारे १५३८ वर शाळा आहेत. शासनाने शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञाना पुरविले आहे. पण वीज पुरवठाच नसेल तर डिजिटल तंत्रज्ञान वापरणार कसे, हा प्रश्नच आहे. आजच्या घडीला जि.प.च्या शेकडो शाळांमध्ये अंधार पसरला आहे. नागपूर जिल्हा राजकीय पटलावर नेतृत्व करीत आहे. पण येथील शिक्षणाची अवस्था लक्षात घेता, वरिष्ठ राजकीय नेतृत्वाच्या कार्यशैलीकडे बोट दाखविणारी आहे.वीज पुरवठा खंडित असलेल्या शाळांची आकडेवारी असतानाही जि.प.च्या अर्थसंकल्पनात थकीत वीज बिल भरण्यासंदर्भात कुठलीही तरतूद केलेली नाही. मार्च महिन्यात जि.प.च्या जवळपास ३२२ शाळांमधील वीज पुरवठा हा थकीत वीज देयकापोटी खंडित करण्यात आला होता. यानंतर काही शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी स्वखचार्तून हे वीज देयक भरले. मात्र अजूनही शेकडोवर शाळांनी आजही थकीत वीज देयक भरले नाही. थकीत वीज देयक असलेल्या शाळांची माहितीही सादर केली नाहीसदर वीज देयक माफ करण्यासाठी २०१८-१९ व २०१९-२० ची थकित देयकाची माहिती ग्राम विकास विभागाने मागितली होती. या विषयावर राज्याचे शालेय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येणार असल्यामुळे नागपूर जि.प.प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी ३ जुलै रोजी पत्रक काढून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना तालुक्यातील शाळांवर असलेल्या थकीत देयकाची माहिती ४ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून ही माहितीच आली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरSchoolशाळाPower Shutdownभारनियमन