शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शाळा दत्तक योजना विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोकादायक, शिक्षक समितीचा आरोप

By गणेश हुड | Updated: September 22, 2023 16:43 IST

शासनाकडे निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी

नागपूर : राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उद्योजकांना दत्तक देण्याचा निर्णय भविष्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस निळकंठ लोहकरे यांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांना  निवेदन दिले.

शिक्षण हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार बालकांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही शासनाची आहे. प्राथमिक शिक्षणाकरिता सकल उत्पन्नाच्या सहा टक्के तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात न करता शिक्षणाची जबाबदारी उद्योग समूहावर सोपविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

उद्योग समूहाला शाळा दत्तक दिल्यास दुर्गम भागातील, वाडी वस्ती व तांड्यावरील कमी पटसंख्येच्या शाळा बंद पडतील. भविष्यात उद्योग समूहांची शिक्षण क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण होईल. त्यामुळे शासनाचा हा निर्णय म्हणजे शिक्षणाच्या खाजगीकरणाची सुरुवात ठरेल अशी शंका शिक्षक समितीने व्यक्त केली आहे. शिष्टमंडळात शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, निळकंठ लोहकरे, अनिल नासरे, प्रकाश सव्वालाखे, उज्ज्वल रोकडे, विजय उमक, प्रकाश जाधव आदींचा समावेश होता.

कंत्राटी नोकर भरती म्हणजे वेठबिगारी

कंत्राटी पद्धतीने नोकरभरती म्हणजे वेठबिगारी पद्धत निर्माण करणारी आहे. लोकशाही मूल्य व संवैधानिक तत्त्वांना हरताळ फासणारी आहे. त्यामुळे नोकरभरतीचे कंत्राटीकरण व शाळा दत्तक योजनेचा निर्णय रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा