शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

नागपूर जिल्ह्यात दर महिन्याला २१०० टन रेशन धान्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:10 IST

सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचे संगणकीकरण झाल्यापासून रेशन दुकानांमधील धान्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. पूर्वी शासनाकडून जितके धान्य मिळायचे ते सर्व वितरित झाले असे दाखविले जात होते. परंतु आता ते शक्य नाही. लाभार्थ्यांनी नेमके किती धान्य उचलले याचा सर्व डेटा असतो. त्यामुळे धान्याची बचत होत आहे. सरासरी विचार केला तर एकट्या नागपूर जिल्ह्यातच दर महिन्याला जवळपास २१०० टन रेशनच्या धान्याची बचत होत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, प्रशांत काळे आणि लीलाधर वर्डीकर यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.

ठळक मुद्देभास्कर तायडे : संगणक वितरण प्रणालीचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचे संगणकीकरण झाल्यापासून रेशन दुकानांमधील धान्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. पूर्वी शासनाकडून जितके धान्य मिळायचे ते सर्व वितरित झाले असे दाखविले जात होते. परंतु आता ते शक्य नाही. लाभार्थ्यांनी नेमके किती धान्य उचलले याचा सर्व डेटा असतो. त्यामुळे धान्याची बचत होत आहे. सरासरी विचार केला तर एकट्या नागपूर जिल्ह्यातच दर महिन्याला जवळपास २१०० टन रेशनच्या धान्याची बचत होत आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, प्रशांत काळे आणि लीलाधर वर्डीकर यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्य शासनातर्फे सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण केले जात आहे. याअंतर्गत अनेक गोष्टी केल्या जात आहेत. जसे रेशन कार्ड आधारसोबत लिंक करणे, लाभार्थ्यांचे डिजिटायझेशन, प्रत्येक रेशन दुकानामध्ये पॉज (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आंध्र प्रदेश आणि हरियाणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नागपूर शहर पुरवठा विभागामध्ये एईपीडीए (आधार एनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) ही धान्य वितरणाची नवीन पद्धत पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूरमध्ये १ आॅक्टोबर २०१७ पासून राबविण्यात येत आहे. या पद्धतीमुळे १०० टक्के धान्याचे वितरण हे आधार व्हेरिफाईड करून दिल्या जात आहे. ई-पॉस या मशीनद्वारे गेल्या १३ महिन्यात शहरात ७४,३८३.२५ मेट्रिक टन धान्याचे वितरण करण्यात आले असून, २५,३९१.७५ मेट्रिक टन धान्याची बचत झाली. या पद्धतीमुळे शहरात दर महिन्याला सरासरी १७०० टन धान्याची बचत होत आहे, तर ग्रामीण भागामध्ये १५०० टन धान्याची महिन्याला बचत होत आहे.नागपुरात ६७ हजार ‘सायलंट कार्ड’धारकनागपर शहरात ३० हजार व जिल्ह्यात ३७ हजार असे एकूण ६७ हजार कार्डधारक असे आहेत, जे धान्य लाभार्थी आहेत, परंतु त्यांनी अजूनपर्यंत धान्याची उचल केलेली नाही, त्यांना सायलंट कार्डधारक असे संबोधले जाते, असेही यावेळी सांगण्यात आले.सलग सहा महिने धान्य न उचलणाऱ्यास नोटीससलग सहा महिने धान्याची उचल न करणाऱ्या कार्डधारकास नोटीस बजावण्यात येईल. त्यांना धान्याची उचल का केली नाही? अशी विचारणा केली जाईल. ज्यांना गरज आहे ते कार्यालयाशी संपर्क साधतील. जे येणार नाही त्यांना धान्याची गरज नाही असा त्याचा अर्थ काढून त्यांना धान्य लाभार्थीमधून वगळले जाईल. त्यांचे रेशन कार्ड मात्र कायम राहील, अशी माहिती भास्कर तायडे यांनी दिली.रॉकेल लाभार्थी १.१० लाखावरून ६९ हजारावरनागपूर जिल्ह्यात १ लाख १० हजार रॉकेल लाभार्थी होते. अशा लाभार्थ्यांना त्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही, याचे हमीपत्र लिहून द्यायचे होेते. ते मागितले असता १.१० लाख लाभार्थ्यांची संख्या ६९ हजारावर आली, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर