शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'साहित्य संघाला राजकारणी, व्यापाऱ्यांपासून वाचवा'; वर्तमान कार्यकारिणीही कुचकामी असण्याचा आराेप

By निशांत वानखेडे | Updated: February 5, 2026 20:26 IST

Nagpur : ज्या प्रमाणे क्रीडा संस्था या खेळाडूंनीच चालवायच्या असतात, त्याचप्रमाणे साहित्य संस्था देखील साहित्यिकांनाच चालवू द्यायला हव्यात. मात्र विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत साहित्यिक नसलेल्यांचा, व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे.

नागपूर : ज्या प्रमाणे क्रीडा संस्था या खेळाडूंनीच चालवायच्या असतात, त्याचप्रमाणे साहित्य संस्था देखील साहित्यिकांनाच चालवू द्यायला हव्यात. मात्र विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत साहित्यिक नसलेल्यांचा, व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. साहित्याशी त्यांचा संबंध नसून राजकीय पाठबळ मिळवून संस्थेची इमारत व मालमत्तेवर त्यांचा डाेळा आहे. त्यामुळे अशा राजकारणी, व्यापाऱ्यांपासून वि. सा. संघाला वाचवा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जाेशी यांनी केला आहे.

निवडणुकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार असलेल्या श्रीपाद जाेशी यांच्यासह समर्थक असलेले पीडीकेव्हीचे माजी कुलगुरू डाॅ. शरद निंबाळकर, विनाेद देशमुख, मेघना वाहाेकर, वसंत वाहाेकर, प्रकाश दुलेवाले, विलास देशपांडे आदी उपस्थित हाेते. साेबत अध्यक्ष व सदस्य पदासाठी अर्ज केलेले प्रमाेद भुसारी हे देखील उपस्थित हाेते. निवडणुकीत गिरीश गांधी यांनी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पाठींबा असल्याचा प्रचार केला जात आहे. यावरच श्रीपाद जाेशी लक्ष्य करताना दिसले. साहित्य संस्थेच्या निवडणुकीत इतरांनी पडू नये, अशी टीका त्यांनी केली. साहित्य संस्था या सेवाभावी संस्था असून सत्तेची किंवा राजकारणाची केंद्र नव्हेत. साहित्यिकांनी ही संस्था शंभर वर्षापासून टिकवली, वाढवली आहे. यांनी संस्थेसाठी एक थेंबही घाम गाळला नाही, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी त्यांनी वर्तमान कार्यकारिणीवरही कुचकामी असल्याचा आराेप केला. कार्यकारिणीचे काम इमारत, मालमत्ता सांभाळणे नाही, तर वाङ्मयीन सेवा करणे आहे. वर्तमान कार्यकारिणीने वाङ्मयीन सेवेचे काेणतेही काम आपल्या कार्यकाळात केले नाही. अभिजात मराठी भाषेचा विषय, मराठी भाषा, संस्कृती संवर्धनाविषयी त्यांनी कधी भूमिका घेतली नाही, अशी टीका जाेशी यांनी केली. सरकारला भाषाविषयक मार्गदर्शन करण्याची कुवत नसलेले खुजे संस्थेवर कार्यरत असल्याचा गंभीर आराेप त्यांनी यावेळी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Protect Sahitya Sangh from Politicians, Businessmen: Current Body Ineffective, Alleges Joshi

Web Summary : Senior writer Shripad Joshi urges protection of Vidarbha Sahitya Sangh from politicians and businessmen eyeing its assets. He criticized the current leadership for neglecting literary service and failing to advocate for Marathi language and culture.
टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूरPoliticsराजकारणVidarbhaविदर्भ