शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

उपराजधानीत १५० टँकर कमी केल्याने ९.५० कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:16 IST

गेल्या वर्षी नागपूर महापालिकेला ४५१ टँकरवर २७ कोटींचा खर्च करावा लागला. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या वर्षासारखी पाणीटंचाई नसल्याने १५० टँकर कमी करण्यात आले. यामुळे ९ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे.

ठळक मुद्देवर्षाला टँकरवर २७ कोटीचा खर्चपावसाळ्यात टँकरची मागणी पुन्हा कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्ष २०१८ मध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात नागपूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. शहरात पाणी पुरवठ्याचे नेटवर्क असलेल्या भागात १०५ तर नॉन नेटवर्क म्हणजेच शहरालगतच्या भागात ३४६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागला. ४५१ टँकरवर गेल्या वर्षी महापालिकेला २७ कोटींचा खर्च करावा लागला. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या वर्षासारखी पाणीटंचाई नसल्याने १५० टँकर कमी करण्यात आले. यामुळे ९ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे.नॉन नेटवर्क भागात ३५४ टँकर सुरू होते. यातील १२० टँकर बंद करण्यात आले असून सध्या २२६ टँकर सुरू आहेत. तर नेटवर्क भागात १०५ टँकर सुरू होते. यातील ३० टँकर बंद करण्यात आले असून सध्या ७० टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने व अधूनमधून अवकाळी पाऊस येत असल्याने विहिरींना अजूनही पाणी आहे. त्यामुळे दरवर्षी सारखी या उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही. याचा विचार करता टँकर कमी करण्यात आले आहेत.नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळयात पाणीटंचाई जाणवणार नाही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी अचानक वाढते. गेल्या वर्षी जलसाठा संपल्याने मृत साठ्यातील पाण्यांचा वापर करावा लागला होता. मनपाला यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागली होती. त्यानंतर हा पाणीसाठा वापरता आला होता.पावसाळ्यात पुन्हा ७० ते ८० टँकर कमी करणारटँकरवर मनपाला वर्षाला २७ कोटींचा खर्च करावा लागत होता. १५० टँकर कमी केल्याने यात ९ ते १० कोटींची बचत होणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा वापर कमी होतो. याचा विचार करता या कालावधीत पुन्हा ७० ते ८० टँकर कमी करण्याचा विचार आहे. याबाबतचा आढावा घेवून निर्णय घेतला जाईल.यामुळे टँकरवर होणारा खर्च २७ कोटीवर १२ ते १३ कोटींवर येईल. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली.तोतलाडोह प्रकल्पात ७९.६४ टक्के जलसाठातोतलाडोह प्रकल्पात सध्या ७९.६४ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाची क्षमता १०१६,८८दलघमी आहे. आजच्या तारखेला या प्रकल्पात ८०८ दलघमी जलसाठा आहे. यामुळे नागपूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. लॉकडाऊनमुळे मोठे हॉटेल्स, रेस्टारंट, सर्व्हीसिंग सेंटर, मंगल कार्यालये, लॉन बंद असल्याने पाण्याचा वापर वाढलेला नाही. बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. परंतु बांधकाम बंद असल्याने पाण्याचा वापर कमी आहे. याचा मागणीवर परिणाम झाला आहे.

 

टॅग्स :Waterपाणी