शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

उपराजधानीत १५० टँकर कमी केल्याने ९.५० कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:16 IST

गेल्या वर्षी नागपूर महापालिकेला ४५१ टँकरवर २७ कोटींचा खर्च करावा लागला. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या वर्षासारखी पाणीटंचाई नसल्याने १५० टँकर कमी करण्यात आले. यामुळे ९ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे.

ठळक मुद्देवर्षाला टँकरवर २७ कोटीचा खर्चपावसाळ्यात टँकरची मागणी पुन्हा कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्ष २०१८ मध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात नागपूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. शहरात पाणी पुरवठ्याचे नेटवर्क असलेल्या भागात १०५ तर नॉन नेटवर्क म्हणजेच शहरालगतच्या भागात ३४६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागला. ४५१ टँकरवर गेल्या वर्षी महापालिकेला २७ कोटींचा खर्च करावा लागला. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या वर्षासारखी पाणीटंचाई नसल्याने १५० टँकर कमी करण्यात आले. यामुळे ९ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे.नॉन नेटवर्क भागात ३५४ टँकर सुरू होते. यातील १२० टँकर बंद करण्यात आले असून सध्या २२६ टँकर सुरू आहेत. तर नेटवर्क भागात १०५ टँकर सुरू होते. यातील ३० टँकर बंद करण्यात आले असून सध्या ७० टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने व अधूनमधून अवकाळी पाऊस येत असल्याने विहिरींना अजूनही पाणी आहे. त्यामुळे दरवर्षी सारखी या उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही. याचा विचार करता टँकर कमी करण्यात आले आहेत.नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळयात पाणीटंचाई जाणवणार नाही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी अचानक वाढते. गेल्या वर्षी जलसाठा संपल्याने मृत साठ्यातील पाण्यांचा वापर करावा लागला होता. मनपाला यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागली होती. त्यानंतर हा पाणीसाठा वापरता आला होता.पावसाळ्यात पुन्हा ७० ते ८० टँकर कमी करणारटँकरवर मनपाला वर्षाला २७ कोटींचा खर्च करावा लागत होता. १५० टँकर कमी केल्याने यात ९ ते १० कोटींची बचत होणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा वापर कमी होतो. याचा विचार करता या कालावधीत पुन्हा ७० ते ८० टँकर कमी करण्याचा विचार आहे. याबाबतचा आढावा घेवून निर्णय घेतला जाईल.यामुळे टँकरवर होणारा खर्च २७ कोटीवर १२ ते १३ कोटींवर येईल. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली.तोतलाडोह प्रकल्पात ७९.६४ टक्के जलसाठातोतलाडोह प्रकल्पात सध्या ७९.६४ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाची क्षमता १०१६,८८दलघमी आहे. आजच्या तारखेला या प्रकल्पात ८०८ दलघमी जलसाठा आहे. यामुळे नागपूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. लॉकडाऊनमुळे मोठे हॉटेल्स, रेस्टारंट, सर्व्हीसिंग सेंटर, मंगल कार्यालये, लॉन बंद असल्याने पाण्याचा वापर वाढलेला नाही. बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. परंतु बांधकाम बंद असल्याने पाण्याचा वापर कमी आहे. याचा मागणीवर परिणाम झाला आहे.

 

टॅग्स :Waterपाणी