शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

उपराजधानीत १५० टँकर कमी केल्याने ९.५० कोटींची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:16 IST

गेल्या वर्षी नागपूर महापालिकेला ४५१ टँकरवर २७ कोटींचा खर्च करावा लागला. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या वर्षासारखी पाणीटंचाई नसल्याने १५० टँकर कमी करण्यात आले. यामुळे ९ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे.

ठळक मुद्देवर्षाला टँकरवर २७ कोटीचा खर्चपावसाळ्यात टँकरची मागणी पुन्हा कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्ष २०१८ मध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात नागपूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. शहरात पाणी पुरवठ्याचे नेटवर्क असलेल्या भागात १०५ तर नॉन नेटवर्क म्हणजेच शहरालगतच्या भागात ३४६ टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागला. ४५१ टँकरवर गेल्या वर्षी महापालिकेला २७ कोटींचा खर्च करावा लागला. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात गेल्या वर्षासारखी पाणीटंचाई नसल्याने १५० टँकर कमी करण्यात आले. यामुळे ९ कोटी ५० लाखांची बचत होणार आहे.नॉन नेटवर्क भागात ३५४ टँकर सुरू होते. यातील १२० टँकर बंद करण्यात आले असून सध्या २२६ टँकर सुरू आहेत. तर नेटवर्क भागात १०५ टँकर सुरू होते. यातील ३० टँकर बंद करण्यात आले असून सध्या ७० टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने व अधूनमधून अवकाळी पाऊस येत असल्याने विहिरींना अजूनही पाणी आहे. त्यामुळे दरवर्षी सारखी या उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही. याचा विचार करता टँकर कमी करण्यात आले आहेत.नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळयात पाणीटंचाई जाणवणार नाही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी अचानक वाढते. गेल्या वर्षी जलसाठा संपल्याने मृत साठ्यातील पाण्यांचा वापर करावा लागला होता. मनपाला यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागली होती. त्यानंतर हा पाणीसाठा वापरता आला होता.पावसाळ्यात पुन्हा ७० ते ८० टँकर कमी करणारटँकरवर मनपाला वर्षाला २७ कोटींचा खर्च करावा लागत होता. १५० टँकर कमी केल्याने यात ९ ते १० कोटींची बचत होणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा वापर कमी होतो. याचा विचार करता या कालावधीत पुन्हा ७० ते ८० टँकर कमी करण्याचा विचार आहे. याबाबतचा आढावा घेवून निर्णय घेतला जाईल.यामुळे टँकरवर होणारा खर्च २७ कोटीवर १२ ते १३ कोटींवर येईल. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष व जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली.तोतलाडोह प्रकल्पात ७९.६४ टक्के जलसाठातोतलाडोह प्रकल्पात सध्या ७९.६४ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाची क्षमता १०१६,८८दलघमी आहे. आजच्या तारखेला या प्रकल्पात ८०८ दलघमी जलसाठा आहे. यामुळे नागपूर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. लॉकडाऊनमुळे मोठे हॉटेल्स, रेस्टारंट, सर्व्हीसिंग सेंटर, मंगल कार्यालये, लॉन बंद असल्याने पाण्याचा वापर वाढलेला नाही. बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. परंतु बांधकाम बंद असल्याने पाण्याचा वापर कमी आहे. याचा मागणीवर परिणाम झाला आहे.

 

टॅग्स :Waterपाणी