शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

गरिबीपुुढे हरली संजनाची एकाकी झुंज! शिक्षण घेता येत नसल्याने मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 19:46 IST

Nagpur News पदवीचे शिक्षण घेताना आड येणाऱ्या आर्थिक चणचणीतून आलेल्या नैराश्यातून संजना संजय सातपुते (२०) हिची एकाकी झुंज संपली. नैराश्यातून टोकाचा निर्णय घेत गुरुवारी संजनाने मृत्यूला कवटाळले.

नितीन नागपुरे

नागपूर : दहावीला ८५ टक्के! उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा टप्पा गाठण्याचा संकल्प. गरिबीतही ती परिस्थितीशी लढली. बारावीचा टप्पाही पूर्ण केला. मात्र पदवीचे शिक्षण घेताना आड येणाऱ्या आर्थिक चणचणीतून आलेल्या नैराश्यातून संजना संजय सातपुते (२०) हिची एकाकी झुंज संपली. नैराश्यातून टोकाचा निर्णय घेत गुरुवारी संजनाने मृत्यूला कवटाळले.

नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे शेतकऱ्याच्या मुलीने गरिबीमुळे गळफास लावल्याने समाजमन सुन्न झाले आहे.

संजनाचे वडील संजय सातपुते यांच्याकडे अर्धा एकर शेती आहे. शेतीसोबतच टेलरिंगचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तिची आई विद्या मजुरीचे काम करते. धाकटी बहीण सिमरन बी.बी.ए. करीत आहे. मला नोकरी लागली की सर्व बरे होईल, असा विश्वास देणाऱ्या संजनाच्या मृत्यूने वडील संजय आणि आई विद्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी संजनाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र तिच्या मृत्यूमुळे गरिबीच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकायचे नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे.

हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या राज्यकर्त्यांनी संजनाप्रमाणेच इतर मुलांवर अशी वेळ येऊ नये यासाठी ठोस निर्णय घेण्याचीही मागणी यानिमित्ताने होऊ लागली आहे.

नरखेड तालुक्यात गतवर्षभरात २० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. अशात वडिलांची अर्धा एकर शेती असताना मिळेल ते काम करून संजनाने वरुड येथे बी.एस्सी.ला प्रवेश घेतला होता.

ऑनलाइन परीक्षेसाठी नव्हता मोबाइल

संजना बी.एस्सी.ला असताना कोविडमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या. मात्र परीक्षा देण्यासाठी मोबाइल नसल्याने न खचता ती शेतात मजुरीच्या कामावर गेली. यानंतर मोबाइल विकत घेत परीक्षाही दिली. मात्र बी.एस्सी. प्रथम वर्षाचा एक पेपर ऑनलाइन सबमिट न झाल्यामुळे तिला अंतिम वर्षाला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ती खूप निराश होती.

कॉम्प्युटर क्लासला जाण्यासाठी नव्हते पैसे

प्रथम वर्षाचा एक पेपर बॅक असल्याने बी.एस्सी.च्या अंतिम वर्षाला प्रवेश मिळाला नसल्याने संजनाने काही दिवस जलालखेडापासून दोन कि.मी.अंतरावरील दूध डेअरीवर काम केले. यानंतर तिने काटोल येथे कॉम्प्युटर क्लासेसकरिता प्रवेश घेतला होता. परंतु रोज काटोलला जाण्यासाठी पैसे नसल्याने ती खचली होती.

मुलींना शिकवायचे की जगवायचे?

अर्धा एकर शेती असलेले संजय सातपुुते कोविड काळात रोजगार नसल्याने खचले होते. अशात यंदा अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत मुलींना शिकवायचे की जगवायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मात्र संजनाच्या मृत्यूने ते पूर्णपणे खचले आहेत. वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने संजनाने त्यांना कधीही शिक्षणासाठी पैसे मागितले नाही. मिळेल ते काम करून शिक्षण सुरू ठेवले.

स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि नोट्सही

संजना चांगली नृत्य करायची. नृत्य स्पर्धेत नेहमी तिचा पहिला क्रमांक यायचा. पदवी शिक्षण घेताना तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. यासाठी तिने पुस्तकेसुध्दा विकत घेतली होती. शुक्रवारी लोकमत प्रतिनिधीने तिच्या घरी भेट दिली असताना स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि फॉर्मुल्यांचे चार्ट, नोट्स दिसून आले. निराशेतून दोन दिवसांपूर्वी संजनाने तिची सर्व कागदपत्रे जाळली होती. मात्र मृत्यूपूर्व तिने लिहिलेली कुठलीही चिठ्ठी आढळून आली नाही.

प्रशासनाला कधी येणार जाग?

गरिबीमुळे संजनाने आत्महत्या केली. मात्र गत दोन दिवसात तालुका प्रशासनाचा एकही अधिकारी तिच्या घरी पोहोचला नाही. गुरुवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. जलालखेड्याचे ठाणेदार मनोज चौधरी या घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू