शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

अभयारण्य, पर्यटन स्थळांना पर्यटकांची प्रतीक्षा; ताडोबा ५०-६० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 7:00 AM

Nagpur News Tadoba ताडोबा येथे पहिल्याच आठवड्यात लोकांची गर्दी उसळली होती पण नंतर हा प्रवाह काहपसा कमी झाला. मात्र इतर ठिकाणचे सुनेपण तर अद्याप संपलेले नाही.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहा महिन्याच्या बंदिवासानंतर अभयारण्यांचे गेट सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला खरा पण या स्थळांवर पर्यटकांची प्रतीक्षा कायम आहे. कोरोनाच्या कंटाळवाण्या स्थितीतून बाहेर येत प्राणिदर्शनासाठी नागरिकांचे पाय वळतील, अशी अपेक्षा होती पण भीती कायम आहे. ताडोबा येथे पहिल्याच आठवड्यात लोकांची गर्दी उसळली होती पण नंतर हा प्रवाह काहपसा कमी झाला. मात्र इतर ठिकाणचे सुनेपण तर अद्याप संपलेले नाही.राज्य शासनाने १ ऑक्टोबरपासून सर्व अभयारण्ये, पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी सुरू करण्याची परवानगी दिली. वनविभागाने लोकांना संसगार्चा धोका टाळण्यासाठी नियमांची कडेकोट व्यवस्था उभारली. पहिल्याच आठवड्यात ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य पर्यटकांनी फुलले होते. पहिले तीन दिवस चांगलीच गर्दी उसळली. वनविभागाच्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी ३२० पर्यटकांनी हजेरी लावली व ८० सफारी वाहन (जिप्सी) अभयारण्यात फिरले. पुढचे तीन-चार दिवस ही गर्दी कायम होती. विकएंडला पुन्हा पर्यटकांच्या उपस्थितीने उत्साह वाढला. पर्यटकांचा सकारात्मक व सुरक्षित प्रतिसाद मिळत असून पहिल्या आठवड्यातील बुकिंग ६०-७० टक्क्यापर्यंत वाढल्याचे ताडोबाचे फिल्ड अधिकारी जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. त्यामुळे ताडोबातील वाघांची भुरळ पर्यटकांमध्ये आजही कायम आहे, असे चित्र होते.मात्र दुसऱ्या आठवड्यापासून गर्दी ओसरत असल्याची स्थिती आहे. कदाचित आर्थिक अडचणी व स्थितीचा विचार करीत सध्या पर्यटकही दूर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे पेंच व बोर अभयारण्यात मात्र हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. जाणकारांच्या मते, हिवाळ्याची चाहूल लागताच पर्यटनासाठी लोकांमध्ये उत्साह संचारलेला असतो. विशेष म्हणजे विदेशी पर्यटकांची गर्दी वाढलेली असते. यावेळी मात्र विदेशी पर्यटकांची उपस्थिती शून्य आहे. आता १० वषार्खालील मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाला स्थिती सुधारण्याची आशा आहे.सहा महिन्यात तीन कोटींचे नुकसानमार्च ते जून महिना पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र कोरोना संक्रमणामुळे १८ मार्चपासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद झाले व संपूर्ण सिझन वाया गेला. या काळात विभागाचे तीन कोटींच्यावर नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय गाईड, सफारी वाहनचालक, रिसॉर्ट मालक यांचाही रोजगार व शेकडो लोकांचा व्यवसाय बुडाला होता. पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता.१५ नंतर कॅन्टर बुकिंग ऑनलाईनअभयारण्यात फिरण्यासाठी पर्यटकांची ओपन बसप्रमाणे असलेल्या कॅन्टरला पसंती असते. वेळेवर येणाऱ्या पर्यटकांना गैरसोय होऊ नये म्हणून कॅन्टरचे गेटवर बुकिंग करण्यात येत होते. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत कॅन्टर फुल्ल असल्याचे सांगून घोळ होत होता. त्यामुळे येत्या १५ ऑक्टोबरपासून कॅन्टर बुकिंग ऑनलाईन करण्यात येत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.ताडोबाशी जुळलेल्या गाईड, जिप्सीचालक, रिसॉर्ट मालक अशा शेकडो लोकांसाठी कोरोना काळातील पाचसहा महिने अत्यंत कठीण गेले होते. पर्यटन सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या आठवड्यात उत्साह होता. आता गर्दी ओसरली आहे पण पुढे स्थिती सुधारेल, अशी आशा आहे.- निखिल अभ्यंकर, रिसॉर्ट चालक

 

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प