शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

एकाच जमिनीची अनेकांना विक्री : कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:20 IST

एकाच जमिनीची अनेकांना विक्री केल्याचे गुंतागुंतीचे प्रकरण हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देगुंतागुंतीचे प्रकरण, अनेकांची झाली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाच जमिनीची अनेकांना विक्री केल्याचे गुंतागुंतीचे प्रकरण हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, ७ जून २०११ ते १५ मार्च २०१९ दरम्यानचे हे प्रकरण असून, त्यासंंबंधाने गुन्हा दाखल झाल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी कळविली आहे.राजेश पुरुषोत्तम बोरकर (वय ५०, रा. वंदना अपार्टमेंट, गोपालनगर) आणि संजय सदुजी सोमकुवर (वय ४६, रा. सुरेंद्रनगर) या दोघांची जम्बुदीप बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स नावाने फर्म आहे. त्यांनी उर्मिला होमदेव जाधव (रा. श्री महालक्ष्मीनगर, नरसाळा), अशोक दत्तूजी मसराम (रा. आदिवासीनगर, दिघोरी) या दोघांकडून १६ नोव्हेंबर २०१० ला भास्कर चव्हाण, उमाबाई खंडाळे, किसन चव्हाण आणि पार्वताबाई गायकवाड यांच्या मुळ मालकीची मौजा चिखली खुर्द येथील २ हेक्टर ९७ आर शेतजमीन विकत घेण्याचा करार केला होता. या जमिनीचा विकास होणार नसल्यामुळे आरोपी जाधव आणि मसरामकडून शेतजमिनीवर डुप्लेक्स बांधून ते विकण्याचा करारनामा बोरकर आणि सोमकुंवर यांनी करून घेतला. मात्र, ही शेतजमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असल्याचे सुधार प्रन्यासकडून स्पष्ट करण्यात आल्याने, बोरकर आणि सोमकुंवरने ७० लाख रुपये प्रति एकर भावाने साडेतीन कोटी रुपयांत पाच एकर जमिनीचा सौदा करून रोख तसेच धनादेशाद्वारे ५० लाख रुपये आणि नंतर १ कोटी २२ लाख असे एकूण १ कोटी ७२ लाख रुपये आरोपी जाधव आणि मसरामला दिले. त्याबदल्यात आममुख्त्यारपत्र तयार करून घेण्यात आले. बोरकर आणि सोमकुंवर याशेतजमिनीवर नंतर ले-आऊट टाकण्यास गेले. त्यावेळी मूळ शेतमालकांपैकी किसन चव्हाण, पार्वताबाई गायकवाड यांनी ०.९८ हेक्टर जमीन २५ जुलै १९९३ ला विकल्याचे उघड झाले. परिणामी, बोरकर आणि सोमकुंवर यांनी उरलेल्या अडीच एकर शेतजमिनीपैकी सव्वाएकर जमीन मूळ मालक उमाबाई खंडाळे यांच्याकडून खरेदी केली. नंतर तेथे जम्बुदीप बिल्डरच्या नावाने ले-आऊट टाकून अरुणा भास्करराव रोकडे यांना ६ जून २०१६ ला तर नीलेश मेश्राम (लाखांदूर, भंडारा) यांना १५ जानेवारी २०१६ ला विकला.त्याची माहिती असूनही आरोपी जाधव आणि मसरामने बनावट सुभाष काळे आणि आशिष सरोदे या दोघांना १५ जानेवारी २०१९ ला तेथील भूखंडाची विक्री करून दिली. ते कळाल्यावर बोरकर आणि सोमकुंवरने आरोपी जाधव आणि मसरामला विचारणा केली असता त्यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे बोरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.आरक्षित जमिनीची खरेदी विक्रीच संशयास्पद !विशेष म्हणजे, पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार ही जमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असताना ती बिल्डर आणि डेव्हलपर्सने विकत घेतलीच कशी आणि आरक्षित जमिनीवर ले-आऊट टाकून लाखो रुपये घेऊन दुसऱ्यांना तेथील भूखंड विकलेच कसे, असा प्रश्न चर्चेला आला आहे. या संबंधाने पोलिसांकडून गोलमाल उत्तरे दिली जात असल्याने हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद बनले आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणाची कसून चौकशी झाल्यास आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी